राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षार्थींनी अलका टॉकीज चौकात आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची राज्यभरातील उमेदवारांची मागणी आहे. या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी पुण्यात आंदोलन केले.

हेही वाचा >>>अश्विनी जगताप, शंकर जगताप समर्थकांकडून इमेज वॉर!; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

case of accommodating contract workers Municipal administration rushes after Supreme Court order
कंत्राटी कामगारांना सामावून घेण्याचे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका प्रशासनाची धावपळ
supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलनस्थळावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता फडणवीस यांनी राज्यसेवेतील बदल २०२५पासून लागू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून २०२५पासून बदल लागू करण्याची विनंती केली.आता घटनात्मक संस्था असलेल्या एमपीएससीने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ‘स्वायत्त आयोग आमचा आधार’ असे फलक घेऊन परीक्षार्थी आंदोलनाला रस्त्यावर बसले आहेत. एमपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे स्पर्धा परीक्षार्थींचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.