scorecardresearch

Premium

मुंबईत विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती वसतिगृहांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहे.

pune important decision higher technical education department suicide student mumbai
मुंबईत विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: मुंबईतील सावित्रीबाई फुले वसतिगृहात विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या अखत्यारितील शासकीय वसतिगृहांचा सुरक्षा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, ही समिती वसतिगृहांचा आढावा घेऊन उपाययोजना करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करणार आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
tanushree dutta on rakhi sawant
“तिने पाच लग्नं केलीत, पण…” तनुश्री दत्ताची राखी सावंतवर टीका; म्हणाली, “तिला पुरुष…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये अमरावतीच्या विभागीय सहसंचालक डॉ. नलिनी टेंभेकर, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापक डॉ. सोनाली रोडे, मुंबईचे विभागीय सहसंचालक डॉ. केशव तुपे यांचा समावेश आहे. ही समिती उच्च शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व शासकीय वसतिगृहांचा आढावा संबंधित प्राचार्य, वसतिगृह प्रमुख, वसतिगृह अधीक्षक, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी यांच्या उपस्थितीत घेईल. त्यानंतर तातडीने करण्याच्या उपाययोजना निश्चित केल्या जातील.

हेही वाचा… कारागृहात कैद्यांकडून होणारा मोबाइलचा वापर होणार कायमचा बंद, कारागृह प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

उपाययोजना करण्यासाठी संबंधित प्राचार्य, अधीक्षक यांच्यामार्फत कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल. उपाययोजनांपैकी ज्या बाबींना शासन मान्यतेची आवश्यकता आहे, त्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करणे, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी उपाययोजना सुचवणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 19:41 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×