लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: डोंबिवलीतील आयरे गाव, ज्योतीनगर झोपडपट्टीकडे जाण्यासाठी लागणाऱ्या आयरे रेल्वे पुलाची देखभाल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या पुलाच्या छत आणि कठड्याचा काँक्रीटचा भाग निकृष्ट झाला आहे. पुलावरुन येजा करताना छताचा कमकुवत भाग कोसळला तर अपघात होण्याची भीती या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जाते.

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Mumbai national park encroachment loksatta news
राष्ट्रीय उद्यान लुप्त होईल… अतिक्रमणांवर कारवाई न केल्यावरून उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
Citizen Centered Leave Protection Digital Personal Leave Protection Right to Privacy
‘विदा संरक्षण’ नवउद्यामींना मारक!
deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad
फर्ग्युसन रस्त्यावर अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
Ambernath Rickshaw driver killed fatal pole road accident
अंबरनाथमध्ये जीवघेण्या खांबामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू, कल्याण बदलापूर राज्यमार्गावर गेल्या आठवड्यात झालेला अपघात

दिवा-वसई रेल्वे मार्गावर आयरे गाव भागात उड्डाण पूल आहे. या पुलाखालून आयरे गाव, ज्योतीनगर झोपडपट्टी, आयरे तलाव भागात जाता येते. आयरे गाव पुलाच्या पलीकडील भागात नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे या पुलाखालून रिक्षा, खासगी वाहने यांची सतत वर्दळ असते. शाळकरी मुले याच भागातून येजा करतात.

हेही वाचा… विचारमंथन व्याख्यान: लोकमान्य टिळक हे आधुनिक इतिहासातील भारताचे नेते – डॉ. सदानंद मोरे

पुलावरुन रेल्वे वाहतूक सतत सुरू असते. या सततच्या दणक्याने पुलाला हादरे बसतात. काही वर्षापूर्वी बांधलेल्या या रेल्वे पुलाची देखभाल केली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. आयरे गाव परिसरात अनेक बेकायदा चाळी, इमारती आहेत. भूमाफियांच्या अवजड वाहनांची या भागातून येजा असते. या पुलाचे नियोजन रेल्वेच्या अखत्यारित आहे. पालिका अधिकारी या विषयात हस्तक्षेप करत नाहीत. पालिकेच्या हद्दीत हा रेल्वे पूल असल्याने या पुलाच्या देखभालीविषयी प्रशासनाने रेल्वेला कळवावे, अशी मागणी आयरे परिसरातील नागरिकांची आहे.

Story img Loader