ठाणे: रेल्वे स्थानकात पुर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी दोन पादचारी पुलांची उभारणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतु या कामासाठी ठाणे महापालिकेडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. डिसेंबर महिनाअखेरपर्यंत पुलाची कामे उरकून ते प्रवाशांसाठी खुले केले जाणार होते. पण, काम रखडल्याने या पुलांसाठी आणखी तीन महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे. शिवाय, कल्याण दिशेकडील पुलाचे काम रखडलेले असतानाच, त्याशेजारी असलेला पादचारी पुल धोकादायक झाल्याने तो बंद करण्यात आला असून यामुळे प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात सहा पैकी चार पादचारी पूल हे रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. त्यातील दोन पुल ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारे आहेत. ठाणे पूर्व भागात राहणाऱ्या नागरिकांना पश्चिमेकडे येण्यासाठी हे पुल बांधण्यात आले आहेत. यातील एक पुल कल्याणच्या दिशेला आहे. तर दुसरा पुल मुंबईच्या दिशेला आहे. या पुलांची देखभाल दुरूस्ती ठाणे महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन करत असते. ठाणे पूर्वेकडील कोपरी, चेंदणी कोळीवाडा, अष्टविनायक चौक भागात राहणारे हजारो नागरिकांना अनेकदा कामानिमित्ताने ठाणे पश्चिम भागात जाण्यासाठी रेल्वे पुलाचा वापर करतात. त्यामुळे हे दोन्ही पुल येथील नागरिकांच्या प्रवासासाठी महत्त्वाचे आहेत. हे पुल जीर्ण आणि धोकादायक झाल्याने ते पाडून त्या जागी नवीन पुल उभारणी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

Pune Airport new terminal, Pune Airport new terminal Fines Rickshaws and Taxis for Picking Up Passengers, Pune Airport, new terminal, rickshaw fines, taxi fines, Aeromall, commercial passenger vehicles, private vehicles, airport regulations
पुणे : नवीन टर्मिनलवरून प्रवास करताय? जाणून घ्या नवीन नियम अन्यथा होईल ५०० रुपयांपर्यंत दंड…
Dombivli railway station marathi news
डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, लोकल पकडण्यासाठी रेल्वे मार्गातून उड्या
ticketless passengers, fine, mumbai,
मुंबई : विनातिकीट प्रवाशांवर बडगा, ५२ कोटी रुपये दंड वसूल
Significant increase in monorail ridership 18 thousand passengers traveled till seven o clock in the evening Mumbai
मोनोरेलच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ; सायंकाळी सात वाजेपर्यंत १८ हजार प्रवाशांनी केला प्रवास
local train passengers, ST buses, mumbai city
मुंबईत रेल्वे प्रवाशांना एसटीचा आधार
pravasi raja din, ST bus, passengers,
एसटी बस प्रवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकल्या जाणार? काय आहे ‘प्रवासी राजा दिन’ उपक्रम जाणून घ्या…
Dombivli, traveler, robbed, Taloja-Khoni road,
डोंबिवली : तळोजा-खोणी रस्त्यावर प्रवाश्याला पोलीस सांगून दिवसाढवळ्या लुटले
cctv camera, Thane station,
ठाणे स्थानकातील ३४ कॅमेरे बंद, निगराणी नसल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा… ठाणे स्थानक परिसरात रिक्षाचालक अडवितात प्रवाशांची वाट; वाहतूक पोलिसांसमोरच रिक्षाचालकांचा उपद्रव

शिवाय, पारसिक बोगदा परिसरातही एक पादचारी पूल उभारण्यात येत आहे. अशाप्रकारे एकूण तीन पादचारी पूलांची उभारणी केली जात आहे. या पुलांच्या कामासाठी २४ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा निधी देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने ठाणे महापालिकेकडे केली होती. यानंतर पालिकेने आठ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून दिला होता. हा निधी मिळताच तीन वर्षांपुर्वी मुंबई दिशेकडील पादचारी पूल पाडून त्या जागी नवीन पुलाची उभारणीचे काम सुरू करण्यात आले. त्याचबरोबर कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलाशेजारीच नवीन पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते.

करोनाकाळात उत्पन्न वसुलीवर परिणाम होऊन जमा-खर्चाचे गणित बिघडल्यामुळे ठाणे महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील निधी दिला नव्हता. करोना काळानंतर आर्थिक परिस्थिती रुळावर येताच पालिकेने चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यानंतर पुलांची रखडलेली कामे पुन्हा सुरू झाली. मुंबईकडील पादचारी पूलाच्या शेडचे, संरक्षित कठडे, फरशी बसविणे अशी कामे शिल्लक आहेत. कल्याण दिशेकडील पुलाचे खांबच केवळ उभारण्यात आलेले आहेत. पालिकेकडून तिसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध झालेला नसल्यामुळे ही कामे पुन्हा रखडल्याचे चित्र आहे. महापालिकेने निधी उपलब्ध केल्यास तीन महिन्यात दोन्ही पादचारी पूल उभे करू असा दावा रेल्वेने केला आहे.

पुलाच्या कामाचा खर्च वाढला

ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई आणि कल्याण दिशेकडे दोन पुल, पारसिक बोगदा येथे एक पुल अशा एकूण तीन पादचारी पूलांची उभारणी केली जात आहे. या पुलांच्या कामासाठी २४ कोटी ९० लाख रुपयांचा खर्च सुरुवातीला अपेक्षित होता. परंतु पुलांची कामे लांबल्यामुळे या खर्चातही आता वाढ झाली आहे. या पुलांच्या कामाच्या खर्चात तीन कोटींची वाढ होऊन तो २७ कोटी ६३ लाख रुपये इतका झाला आहे.

येत्या काही दिवसांत रेल्वे प्रशासनाला पाच कोटी रूपये उपलब्ध करून देणार आहे. उर्वरित निधीही लवकरच उपलब्ध करून दिला जाईल. – धनंजय मोदे, कार्यकारी अभियंता, ठाणे महापालिका

ठाणे स्थानकातील कल्याण दिशेकडील पूल बंद झाल्याने कोपरी, चेंदणी कोळीवाडा भागातील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी असंतोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक रजनीश गोयल यांची भेट घेऊन त्यांना पुलाचे महत्त्व पटवून दिले आहे. महापालिकेकडून निधी उपलब्ध झाला नसल्याने पुलांची कामे रखडली आहे. निधी अभावी कामे थांबवू नका अशा सूचना त्यांना केल्या आहेत. तसेच ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडेही निधी उपलब्धते संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. – राजन विचारे, खासदार, ठाणे लोकसभा.