कल्याण : अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे येथील शहाड जकात नाका जवळील पेट्रोल पंप भागात तीन जणांनी अपहरण केले. म्हारळ गाव भागातील टेकडीवर नेऊन चाकुचा धाक दाखवून त्याच्या जवळील १६ हजार रूपये लुटले. नीरज भोलानाथ यादव (२०) असे अपहरण करून मारहाण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अंबरनाथ भागात राहतो. विनायक मदने, विजय, आर्यन अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास तक्रारदार नीरज शहाड जकात नाका येथे घरी जाण्यासाठी उभा होता. तो वाहनाची वाट पाहत होता. तेवढ्यात तेथे आरोपी आले. त्यांनी नीरजला जबरदस्तीने त्यांच्या दुचाकीवर बसविले. नीरज एकटाच असल्याने तो प्रतिकार करू शकला नाही.

हेही वाचा : कल्याण मधील रोझाली सोसायटीत पदाधिकाऱ्यांकडून साडे चार लाखांचा अपहार, प्रशासकाकडून गुन्हे दाखल

Students have to go to school with hand chains to make their way through the flood
चंद्रपूर: एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताची साखळी; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना…
monkey attack, kolhapur, Student,
माकडाच्या हल्ल्यात कोल्हापुरात विद्यार्थी जखमी
mass protest by villagers due to close of railway gate near nilje village
निळजे गावाजवळील रेल्वे फाटक बंद केल्याने ग्रामस्थांचे जनआंदोलन
24-Yr-Old Woman Accuses Colleague Of Molestation During Badlapur Hiking Trip
२४ वर्षीय महिलेचा बदलापुरात विनयभंग, ऑफिसमधल्या सहकाऱ्यावर केला आरोप
doctor
‘मार्ड’ डॉक्टरांचे काळ्या फिती लावून आंदोलन
medical colleges, maharashtra,
राज्यात नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात होणार
Two minor girls who came for the exam were molested by the old house owner
परिक्षेसाठी दोन अल्पवयीन मुली नागपुरात आल्या; ८० वृद्ध घरमालकाने अश्लील चाळे करून…
Kalyan Dombivli Municipality, Kalyan Dombivli Municipality take action on Illegal Beer Bars and Liquor Shops, Illegal Hookah Parlors, Illegal Beer Bars and Liquor Shops, kalyan news, dombivli news,
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील बेकायदा बार, ढाबे जमीनदोस्त; महाविद्यालये, शाळांच्या परिसरातील गुटखा विक्री टपऱ्यांना सील

म्हाऱळ गावजवळील टेकडीवर नीरजला रात्री नेऊन तेथे त्याला बेदम मारहाण केली. त्याला चाकुचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नीरज जवळील डेबिट, क्रेडिट कार्ड, त्याच्या जवळील रोख रक्कम आरोपींनी काढून घेतली. जवळील एटीएम मधून नीरज समोरच त्याच्या बँक खात्यामधील रक्कम काढली. एकूण १६ हजारांचा ऐवज लुटून झाल्यानंतर आरोपींनी नीरजला तेथेच सोडून पळ काढला. नीरजने महात्मा फुले पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.