ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी घडलेला भीषण अपघात ही केवळ एक दुर्घटना नसून रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पुरावा आहे, असा आरोप कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी केला आहे. कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करताना पाच प्रवासी दारातून खाली पडले आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून विविध स्तरांवरुन या अपघाताबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

गर्दीमुळे प्रवासी नेहमीप्रमाणे दरवाजात लटकून प्रवास करत होते. मात्र, आज सकाळी ही स्थिती जीवघेणी ठरली. या पार्श्वभूमीवर उबाठा गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

प्रवाशांचे जीव हे आकडे नसून कुटुंबांचे आधार आहेत. या निष्पाप प्रवाशांचा मृत्यू म्हणजे थेट रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा परिणाम आहे. जबाबदारांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, असे मुंडे यांनी सांगितले. ही घटना म्हणजे व्यवस्थेतील दोषांचे भयावह दर्शन आहे. जेव्हा जनतेचा जीव धोक्यात येतो, तेव्हा तो केवळ ‘दुर्दैवी अपघात’ म्हणून सोडवणूक करणं ही संवेदनाशून्यता आहे, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मागण्या तात्काळ पूर्ण करा…

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी तात्काळ व्हावी
मृतांच्या कुटुंबियांना किमान २५ लाखांची नुकसानभरपाई द्यावी.
दरवाजांमध्ये लटकणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तत्काळ उपाययोजना राबवाव्यात.
दिवा ते मुंबई लोकल सेवा तात्काळ सुरू करावी.
लोकल गाड्यांचे फेऱ्या वाढवून गर्दी कमी करण्याचे धोरणात्मक पावले उचलावीत.