भारतील रेल्वेला देशाची लाईफलाइन म्हटले जाते. ही रेल्वे सेवा देशातील खेड्यापाड्यासह मोठ्या शहरांना जोडण्याचे काम करते. भारतीय रेल्वे हे प्रवासाचे अतिशय सोयीचे आणि सुरक्षित साधन मानले जाते. यामुळे भारतीय रेल्वेने दररोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन भारतीय रेल्वे हजारो गाड्या चालवत आहे. पण प्रवाशांना प्रवास करताना भारतील रेल्वेच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. यात रेल्वेच्या तिकिटांबाबतही काही नियम आहेत, ज्याचे पालन न केल्यास रेल्वेचे तिकीट असूनही प्लॅटफॉर्मवर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ..

भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुमची ट्रेन दिवसा असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला ट्रेनच्या वेळेच्या दोन तास आधी स्टेशनवर पोहोचावे लागेल. याशिवाय रात्रीची ट्रेन असेल तर तुम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ६ तास आधी पोहोचू शकता आणि स्टेशनवर थांबू शकता. जर तुम्ही दिलेल्या वेळेत स्टेशनवर पोहोचलात तर अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही.

platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Stampede at Bandra Station
Bandra Stampede : “स्पेशल ट्रेनला १६ तास उशीर, एक्स्प्रेस फलाटावर येताच…”, पोलिसांनी सांगितला वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीचा घटनाक्रम!
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Karuna Sharma Cried
Karuna Sharma : उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने ढसाढसा रडल्या करुणा शर्मा, धनंजय मुंडेंना म्हणाल्या, “तू राक्षस…”
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…

पण वर दिलेल्या वेळेपूर्वी स्टेशनवर पोहचल्यास टीटीई तुमच्याकडून दंड आकारु शकतो. जर तुम्हाला नमूद केलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ रेल्वे स्टेशनवर थांबायचे असेल तर अशावेळी तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करावे लागते.

जर तुम्ही ज्या ट्रेनचे तिकीट बुक केले आहे ती ट्रेन उशीरा आली असेल तर अशावेळी हा नियम लागू होत नाही. यावेळी वेळ मर्यादा बदलू शकते. स्थानकावरील प्रचंड गर्दी करण्यासाठी भारतीय रेल्वेने हा नियम लागू केला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी जेव्हा तुम्ही ट्रेनचा प्रवास कराल तेव्हा हा नियम लक्षात ठेवा, अन्यथा विनाकारण तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

Story img Loader