Kalyan railway station fighting video: मुंबई लोकलमध्ये चढणे एक आव्हानात्मक काम आहे. स्टेशन कुठलेही असो, आणि वेळ कितीही उशिरा असो, गर्दी असाच वेगात वाढत जातो. डब्यात प्रवेश करण्याआधीच तुम्हाला ठरवावे लागते की कुठल्या बाजूने प्रवेश करायचा आहे. कारण, एक सेकंदाचा उशीर झाला तरी तुमची संधी गमावलीच समजा. अशा वेळी प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होणे सामान्य आहे.हळूहळू ही धक्काबुक्की हाणामारीत बदलते. गर्दीच्या परिस्थितीत असं घडणं अनेक वेळा सामान्य बनत जातं, ज्यामुळे लोकांमध्ये संघर्ष आणि असहमती निर्माण होतात. कल्याण स्टेशनवर एका लोकल डब्यातील महिलांमधील भांडण चांगलंच चिघळले आणि त्याचे रूप थेट प्लॅटफॉर्मवर पसरले. ट्रेनमधून उतरल्यावर महिलांनी हाणामारी सुरू केली.
मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.
सध्या असाच एक मंबई लोकलमधला भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये महिलांची हाणामारी आणि आक्रमकता पाहून तुम्हालाही धडकी भरेल. व्हिडीओ पाहून शेवटी तुम्हीच सांगा यामध्ये नेमकी चूक कुणाची आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कल्याण स्टेशनवर आलेल्या लोकलमध्ये चढू न दिल्यानं प्लॅटफॉर्मवर उभ्या महिलांनी ट्रेनमधल्या महिलांना अक्षरश: खेचून बाहेर काढलंय, यानंतर दोन्ही गटात हाणामारीही झाली.
पाहा व्हिडीओ
A post shared by Sarika Gode आगरी girl ? (@sarika_gode_h8508)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sarika_gode_h8508 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “बापरे या बायका जीव घेऊनच सोडतील” तर आणखी एकानं, हे प्रकार कधी थांबणार असा सवाल केलाय.
लोकलसेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे नेहमीच होत असलेल्या अशा प्रसंगांवरून मुंबई लोकलचे हे प्रश्न कधी सुटतील हा प्रश्न पडतो.