Viral video: मान्सूनने महाराष्ट्रात जोरदार धडक दिली आहे. यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा लवकर आला आहे. मान्सूच्या पहिल्याच पावसात मुंबईची मात्र दाणादाण उडाली. यावेळी नवी मुंबईत पावसानंतर जागोजागी पाणी साचलं होतं. यावेळी याच पावसाच्या पाण्यात नवी मुंबईत एक भयंकर विषारी अजगर फिरताना दिसला, या ठिकाणी चक्क साचलेल्या पाण्यात एक भलामोठा अजगर सापडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर रस्त्यात पावसाचं पाणी साचलं आहे. आणि यात पावसात अजगर दिसत आहे, हिरव्या रंगाचा विषारी अजगर पाण्यातून तोंड वर काढताना दिसत आहे. आता विचार करा की या पाण्यात आपण चालतोय आणि चुकून अजगरावर पाय पडला तर काय होईल…नक्कीच साप चावणार. या अजगराला पाहून लोकही घाबरले असून रस्त्याच्या कडेला थांबलेले दिसत आहेत.

पावसाचं पाणी बिळात शिरल्यानंतर सरपटणारे प्राणी बाहेर येतात. यात सापांचाही समावेश असतो. ओल्या ऐवजी कोरड्या जागेत राहणे साप पसंत करतात. त्यामुळं पावसाळ्यात साप बिळाबाहेर पडून आपल्या सोयीची जागा शोधण्याचा प्रयत्न करतात. पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं.पावसाळ्यात दरवर्षी सर्पदंशानं अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश टाळण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यावर वेळेवर उपचार न मिळणे, दवाखाण्यात जाण्यासाठी वाहन न मिळणे, दवाखाना लांब असणे, दवाखान्यात सर्पदंशावरील लस उपलब्ध नसणे, अशा कारणांनी नागरिकांना सर्पदंशानंतर आपले प्राण गमवावे लागतात. त्यामुळं पावसाळ्याच्या काळात शेतकरी आणि विशेत: ग्रामीण भागातील नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ sarpmitr_ashtvinayak_more नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

साप दिसला तर काय कराल?

  • शांत राहा, हालचाल टाळा.
  • सर्पमित्रांना तात्काळ कॉल करा.
  • अंधाऱ्या भागात अनवाणी न जाता आधी पाहणी करा.
  • बूट, कपडे वापरण्यापूर्वी झटकून पाहा.

साप दिसला तर असं करू नका :

  • केरोसिन, डिझेल ओतू नका.
  • सापाला मारण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.
  • घराजवळ पक्षांसाठी दाणे ठेवू नका कारण त्यामुळे उंदीर येतात आणि त्यामागे सापही.