साधारणपणे सर्व मुली त्यांच्या वडिलांच्या खूप जवळ असतात. बहुतांश मुलंही प्रत्येक गोष्ट पालकांसोबत शेअर करतात. त्यामुळे सोबतच मुलं पालकांसोबत मजा-मस्करी करायलाही मागेपुढे पाहत नाहीत तसेच काही त्यांची खूप चेष्टाही करतात. मात्र मुलाच्या आणि वडिलांच्या नात्यात बऱ्याचदा थोडं अंतर पाहायला मिळतं. मग ते कधी धाकाचं असतं तर कधी आदराचं. तर काही मुलं अगदी उलट असतात जे वडिलांना आपला मित्रच समजतात. अशाच एका मुलाला आपल्या वडिलांचं ४१ वर्षांपूर्वीचं लव्ह लेटर सापडलंय.
पूर्वी प्रेमपत्र म्हणजे एका विशिष्ट शैलीत प्रेम व्यक्त करण्याची पद्धत होती. आजच्या जगात, सोशल मीडिया आणि ईमेलच्या युगात, प्रेमपत्र लिहितो असं फार कमी लोक दिसतात. पूर्वी लोक एकमेकांना प्रेमपत्रे लिहून त्यांचे प्रेम व्यक्त करायचे. आजच्या पिढीसाठी हे प्रेमपत्र म्हणजे एक अनोखी आणि आकर्षक गोष्ट आहे.असंच एक प्रेमपत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. गंमत म्हणजे हे पत्र जवळपास ४१ वर्षं जुनं आहे. हे पत्र प्रियकरानं आपल्या प्रेयसीच्या वडिलांना लिहिलंय. हे पत्र जेव्हा मुलाला सापडतं तेव्हा तो हे सोशल मीडियावर शेअर करतो आणि आता ते व्हायरल झालंय. हे पत्र वाचून तुम्हालाही निस्वार्थ प्रेम पाहून कौतुक वाटेल आणि कदाचीत डोळ्यांतून पाणीही येईल.
प्रियकराला हे पत्र लिहिण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तो चक्क छत्तीसगढची स्थानिक भाषा शिकला. आणि मग छत्तीसगढ़िया भाषेतच त्यानं हे पत्र प्रेयसीच्या वडिलांना लिहिलं. आता तुम्ही म्हणाल असं लिहलंय ती काय या पत्रात? चला तर मग जाणून घेऊयात.
पाहा ४१ वर्षांपूर्वीचं व्हायरल पत्र
४१ वर्षापूर्वी गर्लफ्रेंडच्या वडिलांना लिहलेलं पत्र व्हायरल
जय जोहार
आदरणीय काका,
माझं हे पत्र वाचून तुम्हाला राग येऊ शकतो किंवा अनेक प्रश्नही मनात येऊ शकतात, याची मला पूर्ण जाणीव आहे. मी तोच मुलगा आहे जो तुमच्या मुलीवर मनापासून प्रेम करतो. आमची ओळख दिल्ली युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत असताना झाली. तिथेच आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.
सध्या मी दिल्लीमध्ये सरकारी नोकरी करत आहे. आमचं कुटुंब प्रतिष्ठित आहे आणि माझी कमाईही चांगली आहे. माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि आम्हा दोघांना लग्न करायचं आहे. आणि तेही तुमचे व काकूंचे आशीर्वाद घेऊनच.तुमच्या आशीर्वादाशिवाय आम्ही कोणताही पुढचा निर्णय घेणार नाही.मी तुम्हाला खरंच विश्वास देतो की, तुमची मुलगी जर माझ्यासोबत राहिली तर तिला कधीच कोणतीही अडचण किंवा दुःख होणार नाही. आमचं नातं प्रेम, शांतता आणि परस्पर समजुतीवर आधारलेलं असेल.मी एक प्रामाणिक माणूस आहे आणि तुमच्या मुलीला सदैव आनंदी आणि सन्मान देण्याचं वचन देतो. मला आशा आहे की तुम्ही याचा गांभीर्याने विचार कराल आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद द्याल.
तुमचे उत्तरच माझ्या आयुष्याची दिशा ठरवेल.
सादर,
असं हे पत्र लिहलं आहे, जे सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय. Rich-Arrival-1427 नावाच्या युझरनं r/indiasocial या रेडिट पेजवर हे पत्र शेअर केलं आहे. यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रया युजर्स देत आहेत.