ऊस दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेला ४८ तासांचा ‘बंद’ शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी दुपारी तीननंतर मागे घेतला. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील सर्व साखर कारखानदारांसह ऊसतोड मजूर, ऊस वाहतूकदार व पोलीस प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला.
    या बंदकाळात दीड दिवसामध्ये जिल्हयातील २९ पकी चालू असलेल्या २५ साखर कारखान्यांपकी प्रत्यक्षात १२ कारखान्यांना गाळप बंद ठेवावा लागला होता. यात पंढरपूर तालुक्यातील, विठ्ठल, संत शिरोमणी वसंतराव काळे, विजय शुगर, माळशिरस तालुक्यातील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, शंकर (सदाशिव नगर), पांडुरंग, सासवड माळी शुगर (माळीनगर), शेतकरी सहकारी (चांदापुरी) हे कारखाने बंद होते. तसेच माढा तालुक्यातील विठ्ठलराव िशदे, विठ्ठल शुगर (म्हैसगाव), करमाळा तालुक्यातील मकाई, आदिनाथ यांचाही त्यात समावेश होता. साखर कारखान्याचे गाळप बंद पडले हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी व्यक्त केली.
बंद काळात माढा, पंढरपूर, करमाळा, माळशिरस तसेच मंगळवेढा, सांगोला येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको, मोच्रे, ठिय्या अशा स्वरूपात आंदोलने झाली. काही अपवाद वगळता हे आंदोलन शांततेत झाल्याचा दावाही घाटणेकर यांनी केला. त्याबद्दल त्यांनी शेतकरी, कार्यकत्रे, व्यापारी व नागरिकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. करमाळा येथील संघटनेचे तालुका प्रमुख गणेश चिवटे यांनीही आंदोलनास भरघोस पािठबा दिल्याबद्दल आभार मानले. या आंदोलनापासून साखर कारखानदारांनी योग्य बोध घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास पुढील महिन्यात पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.