Rishabh Pant Answer on Rohit Sharma Viral Video: भारतीय संघ आयपीएल २०२५ नंतर आता इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. ५ जून रोजी नव्या कसोटी कर्णधारासह भारतीय संघ इंग्लंडसाठी निघाला. काही खेळाडू तिथे आधीच पोहोचले होते, उर्वरित खेळाडू आता इंग्लंडच्या भूमीवर दाखल झाले आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाच्या प्रवासाचा व्हीडिओही शेअर केला आहे. भारतातून रात्री रवाना होताना उपकर्णधार ऋषभ पंतला रोहित शर्माबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर पंतने भन्नाट उत्तर दिलं.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २० जूनपासून खेळवला जाणार आहे. तर तत्पूर्वी भारताच्या अ संघाविरूद्ध टीम इंडिया सराव सामनाही खेळणार आहे यासाठी टीम इंडियाचे खेळाडू, कर्णधार शुबमन गिल आणि उपकर्णधार ऋषभ पंतसह मुंबईहून रवाना झाले. यादरम्यान काही चाहते तिथे पोहोचले.

ऋषभ पंत टीम बसमधून तिथे उतरला तेव्हा चाहत्यांनी त्याला विचारलं की “रोहित शर्मा सर कुठे आहेत?” ज्यावर ऋषभ पंतने उत्तर दिले की “रोहित भाई गार्डनमध्ये फिरत आहे”. यावर पंतला विचारलं की त्याला गार्डनची आठवण येईल की नाही?, यावर पंत लगेच म्हणाला, “अरे गार्डनची तर खूप आठवण येईल.”

रोहित शर्मा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता, तेव्हा त्याने सामन्यादरम्यान खेळाडूंना फटकारले आणि त्यांना ओरडत ताकिद दिली होती की, कोणी गार्डनमध्ये फिरलं तर बघा. रोहित शर्माचं हे ओरडणं स्टम्प माईकवर रेकॉर्ड झालं होतं आणि त्यावेळी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर रोहित शर्माचं हे वाक्य प्रसिद्ध झालं आहे. पंत याच गार्डनविषयी बोलत होता. मुंबई एअरपोर्टवरील हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्याच्या एक दिवस आधी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रोहित शर्माने त्याच्या कसोटी कॅपचा फोटो शेअऱ करत कसोटीतून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. यानंतर काही दिवसांनी विराट कोहलीने देखील भारताच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. हे दोघेही दिग्गज खेळाडू वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या कालावधीनंतर भारताचा संघ प्रथमच विराट कोहली आणि रोहित शर्माशिवाय कसोटी दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी ऋषभ पंतला उपकर्णधाराची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आयपीएल दरम्यान पंतची बॅट शांत होती. पण शेवटच्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आणि फॉर्ममध्ये परतला.