इचलकरंजी जवळ कोंडीग्रे येथे रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत व्यक्ती ही शेजारच्या गावची उपसरपंच असल्याचे कळते. आर्थिक कारणाने हे हत्याकांड घडले असावे असा प्रथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विनायक माने असे मृत तरुणाचे नाव असून तो खोतवाडी गावचा उपसरपंच आहे. खोतवाडी गावामध्ये ही माहिती समजताच माने याच्या नातेवाईकांनी व मित्रमंडळी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जयसिंगपूर पोलिसांना माहिती मिळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

प्राथमिक माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगितले की, विनायक माने यांचे रात्री उशिरा मित्रांसोबत खोतवाडीजवळच्या कोल्हापूर धाब्यावर जेवण झाले होते. त्यानंतर मध्यरात्री २ च्या सुमारास त्याचे आईशी फोनवरून संभाषणही झाले. दरम्यान, आर्थिक देवाणघेवाणीतून ही हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.