विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी आता राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत ज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आहे.

“नागरी सेवा, सैन्य दल, पोलीस आणि इतर संरक्षण दलात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासह त्यांच्यात देशप्रेमाची भावना निर्माण होण्यासाठी ‘NCC Studies’ हा विषय वैकल्पिक विषय म्हणून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठात व सर्व संलग्नित महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.” असं ट्विट राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
mumbai university , law students
पुनर्मूल्यांकन अर्जांचा गोंधळ: मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या नवव्या सत्राचे विद्यार्थी संभ्रमात
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
Engineering Colleges Maharashtra
‘बीई’ करूनही मिळत नाहीये नोकरी!

“विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची जाणीव आणि शिस्तबध्दता निर्माण होण्याच्या दृष्टीने तसेच लष्करी सेवेबाबत आकर्षण निर्माण होण्याच्या दृष्टीने सदरचा अभ्यासक्रम उपयुक्त असून, विद्यार्थ्यांना सैन्य दलाचे प्राथमिक प्रशिक्षण या माध्यमातून मिळणार आहे. जय हिंद.” असं देखील उदय सामंत म्हणाले आहेत.