बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीला आदर्श कपल म्हणून ओळखलं जातं. अनुष्का नेहमी विराटच्या क्रिकेटच्या सामन्यांना हजेरी लावून त्याला सपोर्ट करताना दिसते. तर अनेक मुलाखतींमध्ये विराटदेखील पत्नी अनुष्काबद्दल भरभरून बोलताना दिसलाय. अनेकदा या कपलला ट्रोलदेखील करण्यात आलं आहे, परंतु या कठीण प्रसंगात दोघांनीही कधी एकमेकांची साथ सोडली नाही.

अनुष्का आणि विराटच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहीत आहे. परंतु, तुम्हाला हे माहीत आहे का की विराट आयुष्यात येण्याआधी अनुष्काने या तीन अभिनेत्यांना डेट करण्यास नकार दिला होता.

हेही वाचा… “माझा जवळजवळ गर्भपात…”, मीरा राजपूतने सांगितला ‘तो’ वाईट प्रसंग; म्हणाली, “शाहिद माझ्या डॉक्टरांशी…”

विराट कोहलीला डेट करण्याआधी अनुष्काने रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना रिजेक्ट केलं होतं. करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये याबद्दल अभिनेत्रीने सांगितलं. अनुष्काला जेव्हा विचारण्यात आलं की, ती रणबीर कपूर, अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यापैकी कोणाला डेट करेल आणि कोणाला नाकारेल? तेव्हा अनुष्का म्हणाली की, रणबीर कपूर तर तिचा पहिल्यापासून चांगला मित्रच आहे. अर्जुन कपूरदेखील तिचा मित्र आहे आणि सिद्धार्थ मल्होत्राला ती ओळखत नसल्याने अभिनेत्रीने तिघांना डेट करण्यापासून नकार दिला. अनुष्का शर्माची ही मुलाखत विराट कोहलीला डेट करण्याआधीची आहे.

हेही वाचा… दिव्यांग चाहत्याला ढकललं अन्…, नागार्जुन यांनी ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मागितली माफी, म्हणाले, “मी त्या गृहस्थाची…”

विराट अनुष्काची लव्हस्टोरी

विराट आणि अनुष्का पहिल्यांदा २०१३ मध्ये एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघं लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या तीन वर्षांनंतर ११ जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या आयुष्यात वामिकाचं आगमन झालं. तर यावर्षी १५ फेब्रुवारी २०२४ रोजी या कपलच्या आयुष्यात चिमुकला अकाय आला.

हेही वाचा… “ए काळी आली काळी आली…”, जुई गडकरीला लोक रंगावरून हिणवायचे, अभिनेत्री वाईट अनुभव सांगत म्हणाली, “मी खूप रडायचे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अनुष्का शर्माच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर अनुष्का शेवटची ‘चकदा एक्स्प्रेस’मध्ये झळकली होती. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी गोलंदाज झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित आहे. लेकीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा प्रेक्षक अनुष्काला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.