आयुष्मान खुराना( हा त्याच्या अभिनयासाठी, हटके भूमिकांसाठी ओळखला जातो. अभिनयाबरोबरच त्याला त्याच्या गाण्यांसाठीदेखील मोठी लोकप्रियता मिळताना दिसते. आता मात्र त्याने त्याच्या खासगी आयुष्यातील एका गोष्टीचा खुलासा केल्याने तो चर्चेत आला आहे.

काय म्हणाला आयुष्मान खुराना?

आयुष्मान खुरानाने हॉनेस्टली सेइंग पॉडकास्ट (Honestly Saying Podcast) दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “मी खूप लहानपणी काम करायला सुरुवात केली. १७-१८ वर्षांचा असताना मी पॉप स्टार होतो. २०-२१ व्या वर्षी मी ‘रोडिज’ या शोमध्ये सहभागी झालो होतो. माझा पहिला चित्रपट हिट ठरल्यानंतर मी कसेही वागत होतो. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा लोकप्रिय होतो, त्यावेळी वाटते की, तुमच्या करिअरसाठी १०० टक्के दिले पाहिजेत. पण, करिअर आणि नातेसंबंध, कुटुंब यांच्यातील समतोल साधता आला पाहिजे; हे मला फार लवकर समजले.”

“मला वाटतं महत्त्वाकांक्षा आणि समाधानी यामधील मध्यममार्ग तुम्हाला शोधता आला पाहिजे. असमतोल, अपयश, टीका यामधून जाणे अवघड आहे. एकदा तुम्ही याचा सामना केला की तुम्हाला समतोल साधता येतो. या सगळ्यापासून वेगळे होणे कठीण आहे.”

“तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तुमचा जोडीदार निवडणे. योग्य जोडीदार तुम्हाला उंचीवर नेऊ शकतो, माझ्या यशात पत्नीचा महत्त्वाचा वाटा आहे. आता जर महिला माझ्याकडे आकर्षित होत असतील तर ते माझ्या पत्नीमुळे आहे. तिच्यामुळे मी एक विशिष्ट व्यक्ती बनलो आहे.”

आयुष्मान खुरानाने माशाबल मेहफिल(Mashable Mehfil)ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “एक वेळ अशी होती की मी चंदीगढमध्ये लोकप्रिय मुलगा होतो, मला प्रसिद्धी मिळत होती, मला माझे आयुष्य जगायचे आहे असे म्हणून मी ताहिराबरोबर ब्रेकअप केले. सहा महिन्यांनंतर मला माझी चूक समजली आणि मी ताहिराकडे परत आलो.”

हेही वाचा: Pushpa 2 : “श्रीवल्ली मेरी बायको…”, जबरदस्त डायलॉग अन् अल्लू अर्जुनचा हटके अंदाज; ‘पुष्पा २’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

२०१२ ला आयुष्मान खुरानाचा ‘विकी डोनर’ हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाला फक्त प्रेक्षकांचेच प्रेम मिळाले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. ताहिरा आणि आयुष्मान यांच्याबद्दल बोलायचे तर ते एकमेकांना शाळेपासून ओळखतात. २००८ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली, त्यांना दोन मुले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आयुष्मान ड्रीम गर्ल 2 मध्ये अनन्या पांडेसोबत दिसला होता. आता लवकरच तो एका हॉरर कॉमेडी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.