शाहरुखपाठोपाठ सलमान खाननेही ‘टायगर ३’मधून जबरदस्त कमबॅक केला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘टायगर ३’ने जगभरात आत्तापर्यंत ४५० कोटींची कमाई केली आहे. याआधी सलमानचे ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते ज्याला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दोन्ही चित्रपट सपशेल आपटले. नुकतंच ‘टायगर ३’च्या सेलिब्रेशनवेळी सलमानने मीडियाशी संवाद साधला.

यावेळी सलमानने प्रथमच त्याच्या या दोन्ही फ्लॉप चित्रपटांबद्दल भाष्य केलं. ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ हे दोन्ही चित्रपट फ्लॉप होण्यासाठी आपणच कारणीभूत आहोत आणि यातूनच आपल्याला शिकायला मिळालं असं सलमानने स्पष्ट केलं आहे. चित्रपटांच्या तिकीटांचे दर कमी असल्याने या चित्रपटातून नुकसान झाल्याचं सलमानने मीडियाशी बोलताना सांगितलं.

Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
Marathi actors Pushkar Jog answer to troller
“या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”
varad chawan reveals shocking incident
सीनच्या नावाखाली थोबाडीत मारल्या, गाल सुजला अन्…; मराठी अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग; म्हणाला, “माझे बाबा…”
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…
ram kapoor
श्रीमंत वडिलांनी पैसे पाठवणं बंद केलं अन्…; प्रसिद्ध अभिनेता संघर्षाचे दिवस आठवत म्हणाला, “सेकंड हॅण्ड…”
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत

आणखी वाचा : ‘A’ सर्टिफिकेट देऊनसुद्धा रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’वर चालली सेन्सॉरची कात्री; सुचवले ‘हे’ पाच बदल

सलमान म्हणाला, “ते चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा लोक फारसे चित्रपटगृहात जात नव्हते. त्यावेळी त्या चित्रपटांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन कमी होतं कारण तेव्हा आम्ही तिकीटांचे दर कमी ठेवलेले जेणेकरून प्रेक्षकांचे पैसे वाचतील. तुम्ही ‘टायगर ३’ ६०० रुपये ते १००० रुपये देऊन पाहिलात, पण ‘अंतिम’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’ च्या वेळी तिकीटांचे दर २५० रुपयांपेक्षा जास्त नव्हते. ‘किसी का भाई किसी की जान’ आज प्रदर्शित झाला असता तर कमाईचे आकडे फार वेगळे असते.”

याबरोबरच आपल्या अपयशातून बरंच काही शिकायला मिळालं असंही सलमान म्हणाला. ‘टायगर ३’ला ‘जवान’ किंवा ‘पठाण’चा रेकॉर्ड मोडता आला नसला तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. ‘टायगर ३’ मध्ये सलमानसह कतरिना कैफ व इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटानंतर सलमान आता करण जोहरबरोबरच्या आगामी ‘बुल’ या चित्रपटात झळकणार आहे.

Story img Loader