मुंबई : मुंबईत बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे लोकल सेवा विलंबाने धावू लागली आणि नोकरदारांची तारांबळ उडाली. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा धीम्यागतीने धावत आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सकाळी ११ च्या सुमारास पाऊस पडण्यास सुरुवात झाली. दादर, कुर्ला, शीव, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, वांद्रे, अंधेरी, बोरिवली येथे मुसळधार पाऊस कोसळला. रेल्वे मार्गावरील दृश्यमानता कमी झाल्याने लोकलचा वेग कमी करण्यात आला. परिणामी, लोकल कूर्मगतीने धावण्यास सुरुवात झाली.
लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत आहेत. कल्याण – सीएसएमटीदरम्यान लोकल विलंबाने धावत असल्याने कार्यालयात जाण्यासाठी निघालेले प्रवासी संतप्त झाले आहेत
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.