नागपूर : ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने सिंधू जलकरार स्थगित केला. त्यानंतर पाकिस्तानाचे पंतप्रधानांनी जगभरातील नेत्यांना भेटून भारताने सिंधू जलकरार पूर्ववत करावे यासाठी प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राष्ट्रसंत तुकडोजी तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे एनएसएस व जनकल्याणकारी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वनामती, नागपूर येथे आयोजित तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेचे शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अतुल वैद्य, विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, वानामतीचे संचालक वासुमना पंत उपस्थित होते.
पहलगामच्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतपर भारताने पाकला तडाखा देऊन सिंधू जलकरार तत्काळ प्रभावाने स्थगित केला. यामुळे पाकला प्रामुख्याने सिंचनासह अंतर्गत संघर्षाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान जगभरातील नेत्यांना भेटू सिंधूचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सिंधुचे पाणी मिळालेनाहीतर पाकिस्तान तहानलेला राहील. पाण्याचे युद्ध सुरू झाले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
विदर्भात सिंचन अपुऱ्या सुविधा असल्याने शेतकऱ्यांचा अडचणीचा सामना करावा लागतो. कोरडवाहू शेतीमुळे उत्पादन होत नाही आणि अर्थकारण बिघडते. त्यातून शेतकरी आत्महत्या करतात. पूर्व विदर्भात खात्रीशीर पाणी आहे. पण, पश्चिम विदर्भात खारपट्टा आणि मध्यम पाणी आहे. गेल्या काही वर्षांत सिंचनाची कामे झाली आहेत. बळीराजा योजनेअंतर्गंत ९० सिंचन योजना पूर्वत्वास गेल्या आहेत. गोसेखुर्द प्रकल्प अंतिम टप्प्यात आणला आहे. जलयुक्त शिवार योजना २० हजार गावात राबवली. या योजनेमुळे अनेक गावात पाण्याचे प्रश्न सुटले, असा दावाही त्यांनी केला.
नदी, नाले, ओढे सर्वांधिक प्रदूर्षित सांडपाणी, मलनिस्सारणामुळे होते. तर १० टक्के प्रदूर्षण उद्योगामुळे होते. त्यामुळे जलस्रोत देखील प्रदूषित आहेत. यावर उपाय म्हणून सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, पुर्नवापर करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
पाण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात भांडणे – फडणवीस
पृथ्वीवरील सर्वांत महाग कोणती गोष्ट असेलतर ती पाणी आहे. परंतु निसर्गाने दिल्यामुळे त्याची उधळपट्टी केली जाते. जलसंवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर करणे गरजेचे आहे. पाण्यासाठी देशा-देशातील, राज्याराज्यातील भांडणे सोडा महाराष्ट्रात जिल्हा-जिल्ह्यात पाणीयुद्ध सुरू झाले आहे. नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा यांच्यात इतके पाणी सोडायला हवे म्हणून भांडणे होत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
जलदूत प्रभावी ठरतील – डॉ. खोडे
पाण्याशिवाय मनुष्याचे जीवन नाही. अध्यात्मात आणि आर्थिकबाबतही पाणी महत्वाचे घटक आहे. येत्या काही वर्षांनी पाण्यासाठी युद्ध होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापन आणि शाश्वस्त विकास यावर भर देण्याची आवश्यकता आहे. हीच गरज लक्षात घेऊन जलदूत तयार करण्यात येत आहेत. हे जलदूत जनजागृतीसोबतच छोटे, छोटे प्रकल्प देखील राबवतील, असे डॉ. माधवी खोडे म्हणाल्या.