वर्धा : वेगळा विदर्भ समितीचे अध्यक्ष वामनराव चटप यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेडराजा ते नागपूर, अशी विदर्भ निर्माण यात्रा सुरू आहे. वेगळा विदर्भ का? यावर बोलताना चटप यांनी भाष्य केले आहे.

वामनराव चटप म्हणाले की, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी एमएसआरडीसीला पासष्ट हजार कोटी रुपयांचे कर्ज उभे करायचे आहे. त्याला राज्य सरकारची थकहमी आहे. आधीच सहा लाख ६० हजार कोटींचे कर्ज, त्यात ही थकहमी व विविध जबाबदाऱ्या असणारे राज्य कधीच सक्षम होऊ शकत नाही. म्हणून विदर्भातील जनता शंभर वर्षे महाराष्ट्रात राहली तरी त्यांचा अनुशेष कधीच भरून निघू शकत नाही.

dharmarao baba Atram, Present Evidence, Wadettiwar s Alleged BJP Entry, Press Conference, dharmarao baba Atram Press Conference, vijay Wadettiwar, oppositon leader of maharashtra assembly, congress, ncp, lok sabha 2024, gadchiroli lok sabha seat,
विजय वडेट्टीवार यांच्या भाजप प्रवेशावर धर्मरावबाबा आत्राम उद्या करणार मोठा खुलासा?
Sharad pawar reply on Praful patel statement
‘शरद पवार भाजपाबरोबर जाण्यास ५० टक्के तयार होते’, प्रफुल पटेलांच्या दाव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर
Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
What Devendra Fadnavis Said?
“आमचं स्वप्न शरद पवारांनी पूर्ण केलं, मी त्यांचे आभार मानतो”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा – ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय? डॉ. मोहन भागवत यांचा सवाल

हेही वाचा – विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचण येऊ नये म्हणून मुस्लीम बांधवांकडून मशिदीवरील ध्वनिक्षेपक बंद

विदर्भ स्वतंत्र राज्य हाच पर्याय आहे. राज्यातील दोन हजार सातशे ओसाड गावांपैकी दोन हजार तीनशे गावं विदर्भातील असण्याची आकडेवारी चिंतनीय आहे. सरकार ‘छोटं कुटुंब, सुखी कुटुंब’ अशी घोषणा करते. मग छोटे राज्य सुखी राज्य का होऊ नये,असा सवाल चटप यांनी केला. काँग्रेस भाजपा हे विदर्भ विरोधी असून, ते कधीच स्वतंत्र विदर्भ होऊ देणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. माजी आमदार सरोज काशिकर, प्रभाकर कोंडबतूनवार, सतीश दाणी यांनीही मतं व्यक्त केली.