नवी मुंबई : करोना काळापासून निवडणूक लांबणीवर पडत असल्याने साडेचार वर्षांपासून नवी मुंबई मनपामध्ये प्रशासनराज आहे. याचा फायदा घेत विकासकामांच्या गोंडस नावाखाली भरमसाट कामे केली जात असून यात अनावश्यक कामांना प्राधान्य दिले जात आहे. याबाबत आमदार, माजी नगरसेवक सामाजिक संस्था तसेच अनेक जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र तरीही राजरोसपणे ही कामे सुरू आहेत.

नवी मुंबई शहरात शंभरहून अधिक ठिकाणी सध्या कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असून त्याबरोबरच तेवढीच कामे निविदा प्रक्रियेत आहेत. हे चित्र एखाद्या शहरासाठी सुखावह असले तरी कामाचा दर्जा आणि गरज लक्षात घेता अनेक ठिकाणी अनावश्यक कामे केली जात आहेत तर अनेक ठिकाणी कामे करण्याची नितांत गरज असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

Pune, heavy rain, Regional Transport Office, vehicle tests, Vehicle Aptitude Certificate, Learner s Driving Permit, Permanent License, Dive Test Ground, Alandi Road Test Ground, schedule change, marathi news
पुणे : पावसामुळे आरटीओच्या कामकाजावर पाणी! जाणून घ्या लायसन्ससह इतर चाचण्यांचे बदललेले वेळापत्रक…
economic survey report uncertainty in job sector due to ai
‘एआय’मुळे नोकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचा इशारा
Why is the youth of the state displeased with the contractual recruitment for government posts
शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून राज्यातील युवकांमध्ये नाराजी का?
loksatta analysis reason behind cbi raid on neeri 4 state including in nagpur
विश्लेषण : नीरी’ संस्थेवरील सीबीआय छाप्यांमुळे खळबळ का उडाली? संचालकानेच संस्थेचे मातेरे कसे केले?
Goldman Sachs report points to high government debt
कल्याणकारी योजनांची यंदा उपासमार शक्य! उच्च सरकारी कर्जभारावर ‘गोल्डमन सॅक्स’च्या अहवालाचे बोट
anger among citizens over power outage in amrutdham area of panchavati zws 70
अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष
mumbai reports 3 thousand dog bite incidents in three years
श्वान दंशाच्या घटनांमध्ये वाढ; मुंबईत तीन वर्षांत ३ हजार श्वान चाव्याच्या घटना
Maharashtra state leading in foreign investment Mumbai
विदेशी गुंतवणुकीत राज्य आघाडीवर; ‘मैत्री’ कक्षाकडे उद्याोजकांच्या तक्रारींचा ओघ वाढला

आणखी वाचा-प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे

शहरातील रस्त्यांच्या डावीकडील मार्गिका डांबरीकरण केली जाते. जेणेकरून इंटरनेट, टीव्ही, फोन, विद्युत वाहिन्या टाकणे वा काढणे तसेच त्यांची दुरुस्ती ही कामे सहज व कमी पैशात केली जावीत. मात्र नवी मुंबई हे एकमेव शहर आहे ज्या ठिकाणी डावीकडील मार्गिकेवरही सिमेंट काँक्रीटीकरण केले जात आहे. वाशी रेल्वे स्थानक ते ब्ल्यू डायमंड चौक या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याची डावीकडील मार्गिका उखडून त्यावर सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक चौकाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा घाट नवी मुंबई महापालिकेने घातला आहे.

विविध अनावश्यक कामाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर तिजोरीची लूट केली जाते आहे, असा थेट आरोप अलर्ट इंडिया संस्थेने लोकायुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केला आहे. ऐरोलीत सेक्टर ३ /८, वाशी सेक्टर १४, सीबीडी अशा बहुतांश ठिकाणी पदपथांचे पेव्हरब्लॉक आवश्यक नसताना काढण्यात आले व पुन्हा तेच पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले. कोपरखैरणे सेक्टर १९,१८, १७ अशा रेल्वे स्थानक परिसरातील पदपथांवरील पेव्हरब्लॉक उखडले असून अनेक ठिकाणी एक ते चार फूट खड्डे पडले आहेत, मात्र अशा ठिकाणी सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. नेरुळ स्टेट बँक कॉलनीसमोरील सुस्थितीतील पदपथ उखडून काढण्यात आलेल पेव्हर ब्लॉकच पुन्हा बसवण्यात आले आहेत. अशीच अवस्था रस्त्यांची आहे.

आणखी वाचा-ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?

पामबीच मार्गावर भरतीचे पाणी

याशिवाय पामबीच मार्गावरही कामे सुरू आहेत. आता पर्यंत पावसाळ्यापूर्वी पाम बीच रस्त्यावर डांबरी मिश्रणाचा एक थर दिला जात होता. त्यामुळे कुठेही पाणी साठणे व खड्डे पडणे असे प्रकार होत नव्हते. आता मात्र वाशीत सिमेंट काँक्रीटीकरण सुरू केले आहे. हे काम करतानाही व्यवस्थित काळजी न घेतल्याने भरतीचे पाणी थेट रस्त्यावर आले होते. त्याचा त्रास तीन दिवस सहन करावा लागला.

शहरातील कामे नियमानुसार सुरू आहेत. एखादा रस्ता चांगल्या स्थितीत दिसत असतो, मात्र शास्त्रोक्त पाहणी केली असता तो लवकरच खराब होणार असल्याचे निदर्शनास आले तर त्यावर थर दिला जातो. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे केली जात आहे. -संजय देसाई, शहर अभियंता

रस्त्यांसाठी कोट्यवधींचा खर्च

नवी मुंबई महापालिका ही एमआयडीसीतील रस्ते बांधणी करत असून ४०७ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असून १०४ कोटींची कामे निविदा प्रक्रियेत आहेत. तर शहरांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करताना अनेक रस्ते सुस्थितीत असताना त्यांची दुरुस्ती केली जात आहे. तर ऐरोली ते सीबीडी या परिसरात विशेषत: परिमंडळ दोनमध्ये येणाऱ्या नोडचे अंतर्गत रस्ते अद्याप खराब आहेत. ज्या ठिकाणी स्थानिक दबंग नेते आहेत त्या ठिकाणची कामे जोरात सुरू आहेत. तसेच गवळी देव डोंगरावर काही बाकडे आणि छत्र्या केवळ लावण्यात आल्या आहेत, मात्र खर्च साडेपाच कोटी रुपये दाखवण्यात आला आहे.

आणखी वाचा-बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल

अनावश्यक कामांची यादी

  • सुस्थितीतील रस्त्यांचे पुन्हा पुन्हा डांबरीकरण
  • सुस्थितीतील पदपथ, गटारे तोडून पुन्हा बांधणे
  • सुस्थितीतील विजेचे खांब बदलणे
  • तीन लाखांच्या आतील रकमेच्या अनावश्यक कामांची निविदा काढणे
  • सुस्थितीतील इमारतींमधील पाण्याच्या टाक्या पाडून बांधणे
  • पालिका इमारतींचे तसेच पाण्याच्या टाक्यांचे सुस्थितीतील कुंपण पाडणे व पुन्हा बांधणे.

मुख्यमंत्री, मुख्य सचिव, नगरविकास खात्याचे सचिव ते नवी मुंबई महापालिका प्रशासन या सर्वांकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीच्या अपव्ययाची दखल घेतली जात नसल्याने याबाबतची तक्रार लोकपाल, लोकायुक्त, केंद्रीय दक्षता आयोग यांच्याकडे केली आहे. येनकेन प्रकारेण तिजोरीची लूट या एकमेव हेतूने नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कारभार सुरू आहे. -सुधीर दाणी, सजग नागरिक मंच, नवी मुंबई