पुणे: हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास यांच्या ‘कोई दिवाना कहता है कोई पागल समझता है’ अशा अनेक रचना लोकप्रिय आहेत. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात डॉ. कुमार विश्वास यांनी ‘कवी की कल्पना से’ या विषयावर संवाद साधला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सुरुवातीला विनोद तावडे यांनी विश्वास कुमार शर्मा असे मूळ नाव असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या नावाची गोष्ट सांगितली. त्यानंतर तावडे डॉ. विश्वास यांना ‘हम पुरी खबर रखते है’ असे म्हणाले. भाषणानंतर तावडे डॉ. विश्वास यांचे बोलणे ऐकण्यासाठी प्रेक्षकांमध्ये जाऊन बसले.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
bacchu kadu reaction on mahayuti
प्रहार पक्ष महायुतीबरोबर की विरोधात? बच्चू कडूंनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”
aadesh bandekar recalls memories of election and praise balasaheb thackeray
“…अन् ते माणूसपण उद्धवजींमध्ये पाहिलं”, आदेश बांदेकरांनी सांगितला ठाकरे कुटुंबीयांचा अनुभव; बाळासाहेबांबद्दल म्हणाले…

हेही वाचा… पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

डॉ. कुमार विश्वास यांनीही त्यांच्या भाषणात तावडे यांना कोपरख‌ळी मारली. ‘तुम्ही माझे चाहते आहात म्हणून समोर बसलात असे नाही. तर माझे ऐकलेले लोक मुख्यमंत्री, पंतप्रधान झाले. त्यामुळे आता तुम्ही ऐकताय तर तुम्हीही मोठे व्हाल,’ अशी टिप्पणी केली. त्यावेळी प्रेक्षकांमध्ये हास्यस्फोट झाला. सरकारे येतील आणि जातील, पण लोकशाही टिकली पाहिजे, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यामुळे चुकीच्या गोष्टींवर भाष्य करणे हे कवीचे काम आहे. कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे, असे स्पष्ट मत डॉ. कुमार विश्वास यांनी मांडले.