पुणे : देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळात खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच नैसर्गिक हक्क असून, फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास खूपच आनंद आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महायुतीकडून मुख्यमंत्री पदाबाबत न घेतलेला निर्णय, मंत्रीपदे अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
PM Modi
PM Narendra Modi : “विस्तारवाद नाही, विकासवादाच्या भावनेने काम सुरू”, मुंबईत युद्धनौका आणि पाणबुडीचे उद्घाटन केल्यानंतर मोदींची प्रतिक्रिया
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : सत्ताधाऱ्यांच्या लांगूलचालनाचे उदाहरण
chief minister devendra fadnavis governance to speed up government
राज्य चालवावे नेटके…
devendr fadnavis sanjay raut
“होय, म्हणून फडणवीसांचे कौतुक”, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितले…
Prime Minister Narendra Modi  statement on the occasion of Pravasi Bharatiya Diwas
भविष्य हे युद्धाचे नसून, बुद्धांचे! प्रवासी भारतीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

हेही वाचा : देशात लोकशाहीचे वस्त्रहरण; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे उपोषण

मागच्या वेळी फडणवीस मुख्यमंत्री होतील असे आम्हाला वाटले होते. पण त्यांनी पण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून स्वत: उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर आनंदच झाला असता. मात्र या वेळी ज्यांचे १३२ आमदार आहेत, त्यांचाच मुख्यमंत्री होणार आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्याला ओबीसी मुख्यमंत्री मिळण्याची मागणी केली जात असल्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता भुजबळ म्हणाले, की ओबीसी मुख्यमंत्री होण्यापेक्षा ओबीसी, मागासवर्गीय समाजाचे संरक्षण करणारं मुख्यमंत्री व्हावे असे वाटते.

हेही वाचा : हेल्मेटसक्तीचा आता नवा नियम… कशी आणि कोणावर होणार कारवाई?

म्हणून मताधिक्य कमी झाले…

ईव्हीएमबाबत होत असलेल्या टीकेसंदर्भात भुजबळ म्हणाले, की ईव्हीएममुळे विजय झाला असल्यास मलाही एक लाख मते मिळायला हवी होती. मात्र, माझे मताधिक्य कमी झाले आहे. जरांगे हे माझ्या मतदार संघात सकाळी दहा ते रात्री दोन वाजेपर्यंत फिरले आणि त्यांनी जातीयवाद पसरवण्याच काम केला. त्यामुळे माझे मताधिक्य कमी झालं आहे. नेहमी मला मिळणारे ५६ ते ६० हजारचे मताधिक्य ते आता निम्म्यावर आले आहे.

Story img Loader