अंबरनाथः अंबरनाथ शहराच्या वेशीपुढे कल्याण तालुक्यातील नाळिंबी गावाच्या हद्दीत डोंगरावर एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. अंबरनाथच्या तीन झाडीच्या पुढे कल्याण तालुक्याच्या हद्दीत नाळिंबीजवळ रस्त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या पहाटेच्या वेळी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेला तीन झाडी परिसर हा तसा निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. वसत शेलवलीचे घनदाट जंगल येथे आहे. वन विभागाच्या अखत्यारितील या भागात अनेक नागरिक फेरफटका मारण्यासाठी जात असतात. येथे अनेक प्रेमी युगलही बसतात. अनेक कुटुंबे येथे फिरण्यासाठी येत असतात. तसेच काही टोळकेही येथे मद्यपार्टी करताना अनेकदा दिसतात. या तीन झाडीच्या पुढे कल्याण तालुका सुरू होतो. नाळिंबी आणि वसत शेलवली अशी दोन गावांची ही हद्द आहे.

या भागात गुरूवारी सकाळच्या सुमारास नाळिंबीजवळ असलेल्या डोंगरावर एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकटीचा शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅंट घातलेला तसेच पायात चप्पल असलेला हा पुरूषाचा मृतदेह असल्याची माहिती आहे. मात्र येथऊन शीर गायब आहे. या व्यक्तीचा निर्घुण खून झालाचे प्रथमदर्थी समोर आले आहे. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली आहे.

हा परिसर निसर्गरम्य असल्याने अनेक जण येथे फेरफटका मारण्यासाठी येतात. या जागेवरून उल्हास नदीचे आणि निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते. त्यामुळे येथे कायमच पर्यटकांची गर्दी असते. येथे काही खाद्यपदार्थाची तात्पुरती दुकानेही आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा मद्यपी येथे बसलेले असतात. यापूर्वीही तीनझाडी येथे काही हत्येची प्रकरणे समोर आली होती. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथ शहराच्या वेशीवर खदानीजवळ पोलिसांची चौकी बसवण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जाते आहे. अंबरनाथ शहर जवळ असल्याने उल्हासनगर परिमंडळ चारच्या अखत्यारितील अंबरनाथ पोलीसही कल्याण ग्रामीण पोलिसांना याप्रकरणात सहकार्य करत आहेत.