ठाणे – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाची नवी दिशा देणारा एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. ज्ञानाची दारे सर्वांसाठी खुली व्हावीत या उद्देशाने जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये एकूण २८ स्मार्ट ग्रंथालय उभारण्यात आले आहेत. या स्मार्ट ग्रंथसंग्रहालयांनी ग्रामीण शिक्षण व्यवस्था सशक्त करण्यासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे. तंत्रज्ञानाची जोड आणि वाचन संस्कृतीचा प्रचार यांचा सुंदर संगम म्हणजे हे आधुनिक ग्रंथालय आहेत. विद्यार्थ्यांपासून वाचकांपर्यंत सर्वांसाठी ही केंद्रे माहितीचा खजिना बनली आहेत. तर ग्रामीण भागातील डिजिटल क्रांतीची एक सुरुवात असल्याचे देखिल चित्र आहे.

ठाणे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग लाभला आहे. या ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येतात. याच नाविन्यपूर्ण योजनेत विविध महत्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येतात. याच अंतर्गत जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण तसेच शहापूर या तालुक्यांतील ग्रामपंचातींमध्ये स्मार्ट ग्रंथालयांची उभारणी करण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. ‘वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार’ ही मोहीम सर्वच क्षेत्रात जोर धरत आहे. लहान, तरुण आणि वृद्धांपर्यंत सर्वांनाच वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यातून समाज प्रबोधन व्हावे या उद्देशाने ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधरण) अंतर्गत नागरी सुविधा योजनांतर्गत २८ ग्रामपंचायतीमध्ये स्मार्ट ग्राम ग्रंथालय (ई स्मार्ट ग्रंथालय) तयार करण्यात आले आहेत.चौकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध विषयांची तब्बल २ हजारहून अधिक पुस्तके, ऑडिओबुक्स, स्मार्ट टीव्ही आणि वाय-फाय यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधांनी सुसज्ज असलेले ही ग्रंथालये आहेत. या ग्रंथालयात सर्व गटातील वाचकांना विनामूल्य प्रवेश असून लहान मुलांसाठी कॉमिक्स, बोधकथापर पुस्तके, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरित्र ग्रंथ, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संदर्भ पुस्तकेतसेच इतर विविध विषयातील दोन हजारहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.