Mukesh Ambani on Health Issues: मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांनी १ मे २०२५ रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून आपले पद सुरू केले. तो केवळ त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठीच नाही तर त्याच्या वैयक्तिक आरोग्य संघर्षांसाठी देखील ओळखला जातो. लहानपणापासूनच, अनंतला दमा आणि लठ्ठपणाचा सामना करावा लागला, आणि जरी काही वेळेसाठी त्याचे वजन लक्षणीयरीत्या कमी झाले असले तरी ते पुन्हा वाढले, ज्यामुळे त्याला ऑनलाइन टीकेचा सामना करावा लागला.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, एका व्यक्तीने त्याच्या या कठीण काळात त्याची नेहमीच साथ दिली, असा उल्लेख अनंतने केला. पण ती व्यत्ती अनंतचे पालक मुकेश अंबानी- नीता अंबानी, किंवा त्याची भावंड ईशा अंबानी आणि आकाश अंबानी नाहीत. तर ती त्याची पत्नी राधिका मर्चंट आहे.
आरोग्याच्या समस्यांशी लढत असताना अनंतने त्याची पत्नी राधिका मर्चंटला एक अतुलनीय आधारस्तंभ असल्याचे श्रेय दिले. अनंत म्हणाला, “मी निश्चितच भाग्यवान आहे (ती माझ्याबरोबर आहे).” ती माझ्या स्वप्नातली व्यक्ती आहे. लहानपणापासूनच मला वाटायचे की मी कधीही लग्न करणार नाही कारण मी नेहमीच प्राण्यांची काळजी घेण्यास समर्पित असेन. पण जेव्हा मी राधिकाला भेटलो तेव्हा मला दिसले की तिच्यातही माझ्यासारखीच मूल्ये आहेत. प्राण्यांचे पालनपोषण करण्याची तिची भावना आहे.”
राधिकाने त्याच्या आरोग्याच्या आव्हानांमध्ये एक मजबूत आधार असल्याचेही अनंतने नमूद केले. तो म्हणाला, “माझ्या आरोग्याच्या समस्यांशी झुंजताना, माझ्या कठीण काळात राधिका एका मजबूत आधारस्तंभासारखी उभी राहिली. माझ्या आईवडिलांनीही मला कधीच आजारी असल्यासारखे वाटू दिले नाही. डॉक्टरांनीही काही गोष्टींबाबत प्रयत्न सोडून दिले तरी त्यांनी कधीही हार मानली नाही. शिवाय, राधिकाने मला खूप ताकद दिली.”
राधिका आणि तिच्या कुटुंबाबद्दल अनंतने कृतज्ञता व्यक्त केली आणि म्हटले, “ते मला नेहमीच सांगत असतात की हार मानू नका आणि लढत राहा, विशेषतः अशा व्यक्तीला ज्याने लहानपणापासूनच आरोग्य समस्यांशी झुंज दिली आहे. माझ्यापेक्षा जास्त दुःखात असलेले बरेच लोक आहेत, म्हणून मी प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार मानतो. मी कधीही कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. गॉसिप करणे हे त्यांचे काम आहे, परंतु माझ्यासाठी, माझे कुटुंब आणि त्यांचा आधार अत्यंत महत्त्वाचा आहे.”
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी १२ जुलै २०२४ रोजी मुंबईत लग्नबंधनात अडकले. या भव्य लग्नसोहळ्याला जगभरातील अनेक बड्या मंडळींनी हजेरी लावली होती.