Khan Sir Reception Tejashwi Yadav Viral Video : प्रसिद्ध कोचिंग शिक्षक खान सर यांचा लग्नससोहळा सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरतोय. खान सर यांनी कोणालाही न सांगता गुपचूप लग्न केलं, पण सोमवारी त्यांनी पटणातील एका लक्झरी हॉटेलमध्ये लग्नानंतर भव्य रिसेप्शन सोहळा आयोजित केला होता, यावेळी खान सरांना शुभेच्छा देण्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली होती. याचदरम्यान खान सर यांच्या रिसेप्शन सोहळ्यातील बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात तेजस्वी यादव यांनी खान सर यांना असा प्रश्न विचारला; ज्यावर त्यांनी असे काही उत्तर दिले की, तिथे उपस्थित विरोधी नेतेदेखील जोरात हसू लागले.

व्हिडीओत रिसेप्शन सोहळ्यात उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव खान सर आणि त्यांच्या पत्नीला शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर त्यांच्याशी बोलताना दिसतायत. याचवेळी तेजस्वी यादव खान सरांना विचारतात की, काय झालं लग्न? कधी झालं? यावर खान सरांनी हसत उत्तर दिलं की, आत्ताच भारत – पाकिस्तान संघर्ष सुरू होता, त्याचदरम्यान… आणि हे तुमचेच मॉडेल होते सर, आम्हाला गुपचूप लग्न करायचे होते आणि नंतर सांगायचे होते.

“तुमचीच कॉपी केली सर”

यावर तेजस्वी यादव म्हणतात की, लग्नात फक्त कुटुंबातील लोकच उपस्थित होते का? ज्यावर खान सर उत्तर देतात की, हो फक्त १० ते १२ लोकच होते, मीही तसेच केले जसे तुम्ही केले. आम्ही विचार केला की, आपण कसे लग्न करायचे, कोणाची कॉपी करायची, म्हणून आम्ही तुमच्याच मॉडेलची कॉपी केली सर… त्यांचे हे उत्तर ऐकून स्टेजवर उपस्थित पाहुणे मंडळी आणि विरोधी पक्षांचे नेते मंडळीदेखील जोरात हसू लागले. या उत्तरावर खुद्द नितीश कुमारदेखील मनापासून हसले, हाच व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

दरम्यान, खान सर यांच्या रिसेप्शन सोहळ्यात बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह बिहारचे शिक्षणमंत्री सुनील कुमार, नितीश मिश्रा, केंद्रीय राज्यमंत्री राज भूषण निषाद आणि बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि माजी मंत्री मुकेश सहनी यांच्यासह अनेक राजकीय नेते मंडळी उपस्थित होती. इतकेच नाही तर बॉलीवूड आणि व्यावसायिक क्षेत्रातील काही लोक उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजस्वी यादव यांनी जानेवारी २०२१ मध्ये अतिशय गुपचूप लग्न केले. दिल्लीतील सैनिक फार्म येथे हा विवाह सोहळा पार पडला होता, ज्यामध्ये फक्त कुटुंबातील लोकच उपस्थित होते.