छत्रपती संभाजीनगर : तलाठी भरती परीक्षेतील कथित गैरप्रकार, गुणवत्ता यादीत आलेले ‘टीसीएस’मधील कर्मचाऱ्यांचे नातेवाईक आणि या सर्व प्रकरांकडे होणारे सरकारी दुर्लक्ष या विरोधात परीक्षार्थीनी छत्रपती संभाजी नगर आणि बीड शहरात मंगळवारी रस्त्यावर उतरून असंतोष व्यक्त केला. 

भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही? लोकसेवा आयोगामार्फत केवळ २९६ रुपये शुल्क आकारले जाते, मग खासगी कंपन्या अतिरिक्त शुल्क का घेतात? परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सरकार विशेष तपास पथकाची नेमणूक का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न परीक्षार्थी आंदोलकांनी व्यक्त केले. छत्रपती संभाजी नगरमधील क्रांती चौकात हजारोंच्या संख्येत जमलेल्या परीक्षार्थीनी शासनाच्या भरती प्रक्रियेतील अनागोंदीचा निषेध नोंदवला. छत्रपती संभाजीनगर प्रमाणेच बीड येथेही परीक्षार्थीनी ‘सरकार गैरप्रकारांची चौकशी का करीत नाही,’ असा प्रश्न उपस्थित केला. मंगळवारी सकाळी ११ ते दुपारी १.३० दरम्यान परीक्षार्थीनी हे आंदोलन केले.

Inadequate Public Relations, Misconduct to office bearers , lead to cut the ticket, Mumbai bjp members of parliament, gopal Shetty, Poonam Mahajan, manoj kotak, lok sabha 2024, north Mumbai lok sabha seat, Mumbai north central lok sabha seat, north east Mumbai lok sabha seat, marathi news, bjp Mumbai, Mumbai news,
जनता व कार्यकर्त्यांशी उद्धट वर्तन मुंबईतील भाजपच्या तिन्ही खासदारांना भोवले
former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
eknath shinde
मित्रपक्षांकडून युती धर्माचे पालन नाही; शिंदे गटाच्या आमदारांकडून नाराजी; ठाणे, पालघर पक्षाकडेच ठेवण्यासाठी आग्रह

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती बेकायदेशीर? ठाकरेंच्या आरोपांनतर नार्वेकर म्हणाले…

आम्ही कोणाच्या विरोधात नाही. सरकारच्याही विरोधात नाही. मात्र, परीक्षा पारदर्शकपणे व्हायला हव्यात, असे स्पर्धा परीक्षा पेपर फूटविरोधी कृती समितीच्या नेत्यांनी सांगितले. तलाठी भरतीमध्ये पुन्हा गैरव्यवहार झाला आहे. त्याचे पुरावे विद्यार्थी कसे जमव णार, असा सवाल परीक्षार्थीनी केला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील चुकीचे सांगत आहेत. सरकारने शंका दूर करणे आवश्यक आहेच, पण भरती प्रक्रिया राबवण्यासाठी खासगी कंपन्यांचा एवढा अट्टहास कशासाठी, असा सवालही परीक्षार्थी आंदोलकांनी केला.

आंदोलकांवर गुन्हे

बीड शहरात सार्वजनिक रस्ता बंद करून रहदारीत अडथळा आणल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या धनंजय गुंदेकर, राहुल कांबळे, राहुल कवठेकर आणि सचिन ठेंगळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरती विरोधात संशय निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला होता.

परीक्षार्थीच्या तक्रारी..

* भरती प्रक्रियेसाठीचे शुल्क भरमसाठ.

* आरोग्य भरतीसाठी दोन वेगवेगळी परीक्षा केंद्रे.

* तलाठी भरतीच्या २०० गुणांच्या पत्रिकेतही गैरव्यवहार.

* भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का राबवली जात नाही?

आई- वडील शेतात राबून पैसे पाठवतात. शुल्कापोटी लाखो रुपये खर्च केले. सरकार गैरप्रकारांची चौकशी का करत नाही? – सोमनाथ पवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत का परीक्षा घेतली जात नाही? पारदर्शकपणे परीक्षा घेता येऊ नयेत, याचे आश्चर्य वाटते. – पवन नरसाळ