देशात २४ तासांच्या कालावधीत करोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी ६० हजारांहून कमी राहिली. आता देशातील करोनाबाधितांचा एकूण आकडा ७६,५१,१०७ इतका झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. गेल्या २४ तासांत ५४०४४ जणांना करोनाचा संसर्ग झाला. याच कालावधीत ७१७ जण करोनाने मृत्युमुखी पडल्यामुळे करोना बळींची संख्या १ लाख १५ हजार ९१४ इतकी झाली आहे. याच वेळी, ६७,९५,१०३ आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ८८.८१ टक्के इतके आहे. कोविड-१९ चा मृत्युदर घसरून १.५१ टक्क्यांवर आला आहे. सलग पाचव्या दिवशी करोनाच्या सक्रिय प्रकरणांची संख्या ८ लाखांपेक्षा कमी होती.