Prashan Kishor on Bihar Political Crises : नितीश कुमारांनी बिहारमध्ये असलेली महागठबंधन तोडून एनडीएत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून भाजपाच्या पाठिंब्याचं पत्रही राज्यपालांना सुपूर्द केलं आहे. त्यानुसार, येत्या काही वेळात नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. इंडिया आघाडीची मोट बांधण्यात आघाडीवर असलेल्या नितीश कुमारांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आघाडीला डच्चू दिल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका केली जातेय. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही नितीश कुमारांवर टीकास्र डागलं आहे. बेगुसराच्या जी. डी महाविद्यालयात आज पत्रकार परिषदेत प्रशांत किशोर बोलत होते.

“गेल्या वर्षभरापासून सांगतोय की नितीश कुमार कोणत्याही वेळी पलटी मारू शकतात. अशी वक्तव्ये मी सातत्याने कॅमेरासमोर करतोय. लोकांना माहितेय की नितीश कुमार पलटूराम आणि पलटूरामांचे सरदार आहेत”, अशी टीका प्रशांत किशोर यांनी केली.

ajit pawar visit at rajkot fort malvan
Ajit Pawar : “शिवरायांच्या नावाला साजेसं स्मारक उभारणार”; राजकोट किल्ल्याच्या पाहणीनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया; ठाकरे-राणे वादावर म्हणाले…
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Loksatta karan rajkaran Deputy Chief Minister Ajit Pawar refused to answer whether he would reunite with Sharad Pawar group
शरद पवारांशी हातमिळवणी बाबत अजित पवारांचे मौन
Sanjay Raut on Mahavikas Aghadi
Sanjay Raut : “उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला करणारे दिल्लीच्या अब्दालीचे लोक”, संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “मर्द असाल तर…”
cm eknath shinde reaction uddhav thackeray convoy attack
Eknath Shinde : “अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन…”; उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया!
Pune, Kalyaninagar, Bowler Pub, police action, terror threat, discotheque license, Police Commissioner Amitesh Kumar, pub owners, illegal liquor sale,
पुणे : संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ‘बॉलर’ पबला पोलीस आयुक्तांकडून नोटीस

हेही वाचा >> ठरलं! बिहारमध्ये एनडीएचा प्रस्ताव राज्यपालांनी स्वीकारला, शपथविधीसाठी आमंत्रण; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार?

“आज हे सुद्धा सिद्ध झालं की नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपावाले तितकेच पलटूराम आहेत, जितके नितीश कुमार आहेत. भाजपा चार महिन्यांआधी म्हणत होतं की बिहारमध्ये नितीश कुमारांसाठी भाजपाचा दरवाजा बंद आहे, परंतु, त्यांनी आता हाच दरवाजा नितीश कुमारांसाठी उघडला आहे. कालपर्यंत ज्या नितीश कुमार यांना भाजपा समर्थक शिव्या घालत होते, आज त्यांनाच सुशासनाचे प्रणेते म्हणत आहेत”, असाही टोला त्यांनी लगावला.

नितीश कुमारांचा राजीनामा

नितीश कुमार यांनी राजदशी असलेली आपली युती तोडली असून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र, नितीश कुमार यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे बिहारमधील सरकार आपोआपच बरखास्त झाले आहे. भाजपाने नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मिळताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

हेही वाचा >> “कचरा पुन्हा कचराकुंडीत…”, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची नितीश कुमारांवर टीका

राजदला आणखी ४३ आमदारांची गरज

याआधी नितीश कुमार यांनी २०२२ मध्ये भाजपाशी असलेली युती तोडत राजदला सोबत घेत बिहारमध्ये सरकारची स्थापना केली होती. बिहारच्या विधानसभेतील एकूण २४३ आमदारांत राजदचे ७९ आमदार आहेत. बहुमताचा १२२ चा आकडा पार करण्यासाठी राजदला आणखी ४३ आमदारांची गरज आहे. बिहारमध्ये भाजपा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष आहे. भाजपाचे सध्या ७८ आमदार आहेत.

जदयू आणि भाजपा एकत्र

जदयू आणि भाजपा एकत्र आले तर त्यांच्या आमदारांची संख्या १२३ होते. हा आकडा बहुमत सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे. भाजपाला हिंदुस्तानी आवाम मोर्चा या पक्षाचा पाठिंबा आहे. म्हणजेच या पक्षाचे चार आमदार हे नितीश कुमार आणि भाजपाच्या बाजूने असतील. म्हणजेच नितीश कुमार आणि भाजपा यांना एकत्र येऊन सरकार स्थापन करणे फार अडचणीचे ठरणार नाही.