IND vs AUS WTC Final 2023: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम फेरीत पोहोचला आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत खेळला जाणार आहे. या सामन्याला ७ जून पासून ओव्हलवर खेळवला जााणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचे खेळाडू लंडनमध्ये पोहोचले आहेत, तर काही खेळाडू अजून आयपीएल २०२३ मध्ये व्यस्त आहे. या दरम्यान रोहित शर्माने भारतीय संघाला एक खास संदेश दिला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रोहित शर्माचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. बीसीसीआयने वेबसाईटवर जारी केलेल्या व्हिडीओमध्ये रोहित म्हणाला, “साऊथहॅम्प्टनमध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलनंतर आम्ही लगेच एकत्र आलो आणि पुढच्या सायकलची तयारी सुरू केली.” तो म्हणाला, “मला वाटते की, आम्ही या सायकलमध्ये खरोखर चांगले क्रिकेट खेळलो. अनेकवेळा आव्हाने आमच्यासमोर आली आणि त्यावर मात करण्यासाठी काही खेळाडूंनीच नव्हे, तर सर्वच खेळाडूंनी मोठा उत्साह दाखवला.”

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Ambati Rayudu explains why RCB didn't win a IPL trophy for 16 years
आरसीबीच्या खराब कामगिरीसाठी अंबाती रायुडूने वरिष्ठ खेळाडूंना धरले जबाबदार; म्हणाला, “जेव्हा संघाला गरज असते, तेव्हा…’

रोहितने २०२१ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्याच्या निराशेनंतर नेत्रदीपक पुनरागमन करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. तो म्हणाला, “हे दोन वर्षांचे चक्र आहे आणि या काळात आम्ही बरेच कसोटी सामने खेळलो. या चक्रात अनेक खेळाडू खेळले. प्रत्येक प्रसंगी एका खेळाडूने जबाबदारी सांभाळली. आम्हाला त्याच्यांकडून ज्या प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती, त्याने तशीच कामगिरी केली.”

ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर या तीन प्रमुख खेळाडूंशिवाय भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये प्रवेश करेल. हे तिन्ही खेळाडू जखमी झाले आहेत. रोहित व्यतिरिक्त, फक्त पंत आणि अय्यर यांनी पहिल्या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये प्रति डाव ४० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बुमराहने त्या कालावधीत १० सामन्यांमध्ये ४५ बळी घेतले आहेत.

हेही वाचा – IPL 2023: फायनलपूर्वी एमएस धोनीने घेतली पथिराणा कुटुंबाची भेट, मथीशाची बहीण फोटो शेअर करत म्हणाली, “मल्ली सुरक्षित…”

डब्ल्यूटीसी फायनल २०२३ फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव यादव.