रविंद्र जडेजाची जागा भरणे कठीण आहे, परंतु भारतीय संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलला गरज पडल्यास वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. भारताचे टॉप-६ फलंदाज राईट हँड असणारे फलंदाज असून ऋषभ पंतला टी२० विश्वचषकात खेळवण्याचा अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही आम्ही आमची रणनीती आखून त्याप्रमाणे सर्व काही करणार आहोत.

अशा परिस्थितीत विरोधी संघाच्या गोलंदाजांचा वेग बिघडवण्यासाठी डाव्या हाताच्या फलंदाजाची गरज असते. भारत- पाकिस्तान सामन्यात अक्षरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले, पण हा निर्णय प्रभावी ठरला नाही. केवळ एक धाव घेऊन तो धावबाद झाला. टीम इंडिया सध्या सुपर-१२ चे दोन्ही सामने जिंकून अव्वल स्थानावर आहे.

अक्षर पटेलने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, ‘पाकिस्तानकडे डावखुरा फिरकीपटू नवाज आणि लेगस्पिनर शादाब खान होते. त्यावेळी म्हणूनच डाव्या हाताच्या फलंदाजाला पाठवणे महत्त्वाचे होते आणि मला फलंदाजीसाठी पाठवले. अशा परिस्थितीसाठी नक्की कशी मानसिकता ठेवायची असते हे मला राहुल द्रविड सरांनी सांगितले होते. तुझी विकेटही जाऊ शकते आणि त्यासाठी तू तयार असले पाहिजे, असे ते म्हणाले. मला ही भूमिका देण्यात आली असून मी सराव सामन्यात चांगली कामगिरी केली.”

हेही वाचा :   T20 World Cup: “यापेक्षा मोठी संधी…” कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचे इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर मोठे वक्तव्य

अक्षर पटेलचा फलंदाजी फॉर्म

अक्षर पटेल म्हणाले, “संघाचे ६ अव्वल गोलंदाज उजव्या हाताने खेळतात आणि म्हणून संघ व्यवस्थापनाने त्यांना मधल्या षटकांमध्ये उंच फलंदाजी करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. मी सराव सामन्यात चांगली कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध अक्षर पटेल गोलंदाजीतही महागडा ठरला. इफ्तिखार अहमदने आपल्या एका षटकात तीन षटकार मारले होते. पण नेदरलँड्सविरुद्ध त्याने जोरदार पुनरागमन करत ४ षटकांत १८ धावांत २ बळी घेतले.

हेही वाचा :  T20 World Cup: ‘लाओ भैया दे दो’, सूर्यकुमार यादव सामनावीराच्या पुरस्कारासाठी झाला होता आतुर, पाहा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षर पटेलला त्याच्या गोलंदाजीवर विश्वास

अक्षर पटेलने सांगितले की, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांचा एकमेव षटक खराब टाकले गेले होते.” तो पुढे म्हणाला, “पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर मी व्हिडिओ स्पेशालिस्ट आणि बॉलिंग कोचसोबत बसलो होतो. खरे तर असे काही दिवस असतात जेव्हा फलंदाज तुमच्याविरुद्ध जास्त धोका पत्करतो. मी तीन षटकार मारले, त्यापैकी फक्त एक चेंडू मी खराब केला होता. नेदरलँड्सविरुद्ध खेळपट्टी वेगळी होती आणि मी लांबीही बदलली.