Suryakumar Yadav on Shreyas Iyer: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळला गेला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार फलंदाजी करत वन डे कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या.

जर सूर्यकुमार यादवच्या खेळीबद्दल सांगायचे झाले तर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४९ चेंडूंचा सामना करत ५० धावांची खेळी खेळली होती. ज्यामध्ये एक षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. अनेक दिवसांपासून एकदिवसीय क्रिकेटमधील खराब कामगिरीच्या काळातून जात असलेल्या सूर्याने आपण वन डे क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाज असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या खेळीने दुखापतीतून सावरत असलेल्या श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. सध्या त्याच्या वाईट फॉर्ममधून जात आहे.

eye on suryakumar yadav shreyas iyer in buchi babu tournament
बुची बाबू स्पर्धेत सूर्यकुमार, श्रेयसकडे नजर; मुंबई-तमिळनाडू एकादश सामना आजपासून
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
PAK vs BAN Mohammed Rizwan Broke Rishabh Pant and Andy Flower Record
PAK vs BAN: मोहम्मद रिझवानने मोडला ऋषभ पंतचा विक्रम, पराभूत कसोटी सामन्यात ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला पाकिस्तानी यष्टिरक्षक
ENG vs SL 1st Test Who is Harry Singh Son of India Former Player RP Singh Senior in England Test Team
ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?
Australia Mitchell Starc Statement on the Border Gavaskar Trophy sport news
अॅशेसइतकेच महत्त्व! बॉर्डर-गावस्कर करंडकाबाबत ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कचे विधान
Virat Kohli fights with Asitha Fernando video viral during India vs Sri Lanka 3rd ODI
IND vs SL : असिता फर्नांडोने विराट कोहलीशी घेतला पंगा, अन् सामन्यानंतर… VIDEO व्हायरल
Indian men hockey team goalkeeper PR Sreejesh leads India to semi finals sport news
श्रीजेशमुळे भारत उपांत्य फेरीत; नियोजित वेळेतील बरोबरीनंतर शूटआऊटमध्ये ग्रेट ब्रिटनवर मात
IND vs SL 2nd ODI Match Sri Lanka beat India
IND vs SL 2nd ODI : टीम इंडियाच्या फलंदाजांचे जेफ्री व्हँडरसेसमोर सपशेल लोटांगण, यजमान श्रीलंकेचा ३२ धावांनी दणदणीत विजय

ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विश्वचषकापूर्वी पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवने या संधीचा फायदा घेत पहिल्या सामन्यात दमदार खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याला बाहेर बसण्याचे कारण म्हणजे फलंदाज फ्लॉप झाला.

ऑस्ट्रेलिया मालिकेमुळे भारतीय संघातील काही खेळाडूंना विश्वचषकापूर्वी स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये इशान किशनने संधीचा फायदा घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये आपले स्थान पक्के केले. असाच काहीसा प्रकार आता सूर्यकुमार यादवच्या बाबतीत झाला. एकदिवसीय संघातील खराब कामगिरीमुळे टीकेचा सामना करणाऱ्या या फलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. या खेळीमुळे बरेच काही बदलू शकते.

हेही वाचा: IND vs AUS: “आप एसी में थे, मैं गर्मी में था”, पाच विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी असं का म्हणाला? जाणून घ्या

सूर्यकुमारचे नशीब बदलेल का?

गेल्या काही सामन्यांमध्ये कसोटी असो वा वन डे, सूर्यकुमार यादवला एका खेळाडूमुळे बाहेर बसावे लागले, तो म्हणजे श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्याने सूर्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय मालिकेत अय्यरच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव खेळायला आला. आता दोघांचाही समावेश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्लेईंग-११ मध्ये करण्यात आला होता. त्या सामन्यात जिथे श्रेयस फ्लॉप ठरला आणि सूर्याने अर्धशतक केले. यामुळे श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात आले आहे. जर आगामी दोन वन डे सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही तर त्याला विश्वचषक संघातून देखील वगळले जाऊ शकते.

हेही वाचा: IND vs AUS: अक्षर पटेलची दुखापत किती गंभीर? टीम इंडिया अष्टपैलूच्या शोधात, सामन्यानंतर अश्विनचा स्पेशल Video व्हायरल

भारताने सामना जिंकला

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली. यादरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत १० गडी गमावून २७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने हा सामना पाच विकेट्स राखून जिंकला. आता या विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.