Maharashtra Politics News Updates, 01 August 2025: पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कथितपणे रमी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे कोकाटेंची हकालपट्टी करावी, याची मागणी करण्यासाठी गेलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

या मारहाणीनंतर कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीने आणखी जोर धरला होता. अशात आता माणिकराव कोकाटेंकडून कृषी खाते काढून त्यांच्या कडे क्रीडा खाते देण्यात आले आहे. दत्ता भरणे आता राज्याचे कृषी मंत्री असणार आहेत.

याचबरोबर काल मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल आला असून, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र संततधार असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

याचबरोबर राज्यातील विविध क्षेत्रातील घडामोडींचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेऊया;

Live Updates

Mumbai Maharashtra Breaking News Live Today: महाराष्ट्र लाईव्ह न्यूज अपडेट्स

20:39 (IST) 1 Aug 2025

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नेहरूंचा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या तीन खंडांचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ...सविस्तर बातमी
20:30 (IST) 1 Aug 2025

पत्नीला डान्सबारमध्ये नाचविण्यासाठी पतीने ओलांडली छळाची परिसीमा

मागील तीन वर्षापासून पतीकडून सुरू असलेला अत्याचार असह्य झाल्याने पीडितेने अखेर पोलिसात धाव घेतली. ...अधिक वाचा
20:08 (IST) 1 Aug 2025

तरुणाची भर रस्त्यात हत्या; तीन संशयित ताब्यात; मालेगावमध्ये गुन्हेगारी वाढीस

नितीन निकम (२५) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री रस्त्याच्या कडेला तो उभा असताना दुचाकीवरून तीन जण तेथे आले. ...सविस्तर बातमी
19:56 (IST) 1 Aug 2025

आश्रमशाळा कर्मचाऱ्यांवर अन्याय नाही - मुख्यमंत्र्यांची आंदोलक शिष्टमंडळाला ग्वाही

आदिवासी विकास भवनासमोर शासकीय आश्रमशाळेतील रोजंदारी वर्ग तीन, शिक्षक वर्ग चार कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरु आहे. ...सविस्तर वाचा
19:54 (IST) 1 Aug 2025

तब्बल १८ महिन्यांनंतर यवतमाळ जिल्ह्यासाठी बिंदू नामावली तपासणीचा निर्णय, ३२ पेक्षा अधिक कर्मचारी…

या पूर्वी जिल्ह्याची परिस्थिती अधिक गंभीर होती. पवित्र पोर्टल टप्पा दोनमध्ये संपूर्ण राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक भरती थांबलेली होती. ...सविस्तर बातमी
19:19 (IST) 1 Aug 2025

शासकीय रुग्णालयातील भरती प्रक्रियेत गैरव्यवहार; जिल्हा शल्यचिकित्सकांसह तीन अधिकारी निलंबित

आरोग्य विभागाच्या अकोला मंडळांतर्गत येणाऱ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात भरती प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. ...वाचा सविस्तर
18:56 (IST) 1 Aug 2025

Yavat Violence : दौंडच्या यवतमध्ये कलम १४४ लागू, तणावाचं कारण काय? अजित पवार म्हणाले, "एका व्यक्तीने स्टेटस..."

दौंडच्या यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला होता. सोशल मीडियावर एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यानंतर दोन गट आमने-सामने आले होते. ...अधिक वाचा
17:34 (IST) 1 Aug 2025

भर रस्त्यात गोळीबाराचा थरार; मालेगावात चार गुंडांना अटक

मंगळवारी सायंकाळी अनिस शेख उर्फ अनिस मटकी (४१) हे घराकडे जात असताना एका टोळक्याने त्यांना रस्त्यात गाठले. त्यांच्यावर आधी गोळीबार करण्यात आला. ...अधिक वाचा
16:51 (IST) 1 Aug 2025

नवीन कृषिमंत्री खात्याला न्याय देतील - छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नवे कृषिमंत्री ग्रामीण भागातून आले आहेत. त्यांना त्यांच्या खात्यातील बारकावे माहिती आहेत. त्यामुळे ते या खात्याला न्याय देतील, असा विश्वास अन्न पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ...अधिक वाचा
16:32 (IST) 1 Aug 2025

जळगावमध्ये भरधाव बसचा अपघात; एकाचा मृत्यू, ४५ प्रवासी जखमी

अपघातात गुलाब महाजन (५२, रा. वडगाव, ता. पाचोरा) या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. बसमधील १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. ...अधिक वाचा
16:25 (IST) 1 Aug 2025

धनंजय मुंडे मंत्रिमंडळात परतणार का? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगतिलं, म्हणाले...

राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाते नेते धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतल्याने ते मंत्रिमंडळात परतू शकतात अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. याबद्दल विचारले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतली आहे. वेगवेगळ्या कारणांनी भेट घेतली आहे. कुठल्याही भेटीत मंत्रिमंडळाबाबत चर्चा झालेली नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही. मंत्रिमंडळाची चर्चा ही मी, अजितदाद आणि एकनाथ शिंदे करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

15:14 (IST) 1 Aug 2025

‘एमपीएससी’कडून नियुक्त परिविक्षाधीन अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात अखेर सुधारणा…

शासन निर्णयात दोन वर्षाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या आराखड्याअंतर्गत प्रशिक्षणाचे टप्पे निर्धारित करण्यात आले होते. त्यानंतर विविध शासन आदेशान्वये एकत्रित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या स्वरुपात वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या. ...सविस्तर वाचा
14:44 (IST) 1 Aug 2025

"पदाधिकारी आहात, कुठे चूक होऊ देऊ नका", अजित पवारांचा पदाधिकाऱ्यांना सल्ला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सल्ला देताना म्हटले की, "तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडनू कधीही, कुठेही आणि काहीही चूक होऊ देऊ नका. कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका. कुठे जाऊन गोळ्या चालवू नका."

13:47 (IST) 1 Aug 2025

राज्‍यातील ज्‍युईश प्रार्थनास्‍थळांना पर्यटनाचा दर्जा; इस्‍त्रायलचे वाणिज्‍यदूत कोबी शोशानी यांची अलिबागला भेट 

भारत आणि इस्त्रायलमधील हे सांस्कृतीक नाते अधिक वृद्धींगत करण्याकरिता महाराष्ट्राच्या पर्यटन मंत्रालयासोबत, इस्रायलच्या वाणिज्य दूतावासाने "द ज्यू रूट" चे उपक्रम हाती घेण्‍यात आला आहे ...सविस्तर वाचा
13:34 (IST) 1 Aug 2025

शिवशाही-ॲपेऑटोचा अपघात, रिक्षा चालक जागेवरच ठार; संतप्त जमावाकडून बसवर दगडफेक

छत्रपती संभाजीनगर : बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बसचा आणि अपे रिक्षाचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाल्याची घटना परळीजवळ शुक्रवारी सकाळी घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचालक असलेले श्रीनिवास राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे अपघातस्थळी असलेल्या शिवशाही बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद होती. ॲपेऑटो चालक शेतात कामासाठी महिलांना सोडून परळीकडे निघाला होता. त्यावेळी पांगरी कॅम्प नजीक हा अपघात झालाय. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते.

12:59 (IST) 1 Aug 2025

कोल्हापूर जिल्ह्यात मृत ठरवलेली पत्नी घरी परतली; अंत्यसंस्कार केलेली महिला कोण? याचे गूढ वाढले

या घटनेमुळे पतीसह कुटुंबीय कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथे घडलेल्या या घटनेची वेगळीच चर्चा होत आहे. ...सविस्तर बातमी
12:49 (IST) 1 Aug 2025

Devendra Fadnavis: "हिंदूंना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न", देवेंद्र फडणवीसांची काँग्रेसवर टीका; म्हणाले, "भगवा दहशतवाद…"

Devendra Fadnavis Slams Congress: फडणवीस म्हणाले की, "लोकांना अटक करण्यात आली आणि हिंदुत्ववादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना टार्गेट करण्याचे षड्यंत्र होते." ...सविस्तर बातमी
12:31 (IST) 1 Aug 2025

'मुख्यमंत्र्यांना विनंती, राज्याची प्रतिष्ठा जपा'; कोकाटेंच्या खातेबदलावरून सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

रमी खेळातानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये त्या म्हणाल्या की, "राज्यातील कृषी क्षेत्र पुर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधिमंडळात बसून रमी खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किती संवेदनशील असतील? याहून कहर म्हणजे या कृषीमंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील ? याची शंका आल्याशिवाय राहत नाही. आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रीमंडळात आहे याची खरंतर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे."

"महाराष्ट्र शासनाला 'भिकारी' म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणाऱ्या मंत्रीमहोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे. या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली. एकिकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे. तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही. मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे."

12:18 (IST) 1 Aug 2025

आदिवासीबहुल आठ जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, एसईबीसी प्रवर्गाला १० टक्के आरक्षण, महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीचा निर्णय

नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील आरक्षणाविषयीची बिंदूनामावली निश्चित करण्यात आली. ...सविस्तर वाचा
11:56 (IST) 1 Aug 2025

अनुकंपातत्वावरील शिक्षकांना आता पात्रता परीक्षा द्यावी लागणार, परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त होणार

सप्टेंबर २०२९ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेतले जाणार आहे. ...वाचा सविस्तर
11:29 (IST) 1 Aug 2025

"मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो", संस्कृत येत नसल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या भाषेच्या वादादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात संस्कृत भाषा शिकता आली नाही याची खंत वाटते, असे वक्तव्य केले आहे. कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले, "मोठ्या ज्ञानापासून वंचित राहिलो आहे. संस्कृत कुठल्याही वयात शिकता येते, त्यासाठी प्रयत्न करेन."

11:19 (IST) 1 Aug 2025

Manikrao Kokate : कोकाटेंचे कृषीमंत्रीपद गेलं, रमीचा व्हिडीओ बाहेर काढणाऱ्या रोहित पवारांची पोस्ट चर्चेत; इशारा देत म्हणाले, "खातेबदल केला म्हणजे…"

माणिकराव कोकाटे यांच्या खातेबदलानंतर रोहित पवार यांनी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. ...सविस्तर बातमी
11:18 (IST) 1 Aug 2025

एक लाख कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेसाठी सहाय्य करावे, मुख्यमंत्र्यांचे अशियाई बँकेला आवाहन

राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेगाने सुरु आहेत. अनेक प्रकल्प प्रस्तावित आहेत. यात अनेक वित्तीय संस्थांची मदत लागणार आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...सविस्तर बातमी
11:15 (IST) 1 Aug 2025

अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास विरोध, मुख्यमंत्र्याची केंद्राला हस्तक्षेपाची विनंती

उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षीच्या पूरपरिस्थितीत आणि त्यामुळे नागरिकांच्या हाल-अपेष्टांमध्ये भर घालण्यासारखेच होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...वाचा सविस्तर
10:54 (IST) 1 Aug 2025

पशुपालनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा; वीज, व्याज, मालमत्ता करात सवलत मिळणार

राज्यामध्ये २० व्या पशुगणनेनुसार गायवर्गीय पशुधन १ कोटी ३९लाख ९२ हजार व म्हैसवर्गीय पशुधन ५६लाख ३ हजार६९२ इतके पशुधन आहे. पशुपालन व्यवसायापासून सुमारे ६० लाख कुटुंबे अर्थाजन करित आहेत. ...वाचा सविस्तर
10:53 (IST) 1 Aug 2025

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करू: मंत्री शिवेंद्रराजे भोसले

आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असून, त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार तत्परता दाखवत असून, मातंग समाजाच्या भावना आहेत ते या सरकारने जाणून घेतल्यानंतर या गोष्टीसाठी राज्य सरकार व केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. लवकरच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.

10:21 (IST) 1 Aug 2025

संशयाला पुराव्यांचा आधार नाही! मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाचा निकाल

‘केवळ दाट संशय हा खऱ्या पुराव्यांची जागा घेऊ शकत नाही आणि आरोपींच्या दोषसिद्धीसाठी विश्वासार्ह पुरावे नाहीत’ असे महत्त्वपूर्ण निरीक्षण विशेष न्यायालयाने हा निकाल देताना नोंदवले. ...सविस्तर वाचा
10:20 (IST) 1 Aug 2025

Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, तुमच्या शहरांत १ लिटर पेट्रोलची किंमत काय?

Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते जाणून घ्या. ...अधिक वाचा
10:17 (IST) 1 Aug 2025

Maharashtra News Live Updates: “राष्ट्रवादीच्या गुंडांनी…”, माणिकराव कोकाटेंच्या खातेबदलावर छावा संघटनेची पहिली प्रतिक्रिया

माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेतल्यानंतर यावर छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "या खातेबदलावर समाधानी असण्याचे कारण नाही. राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावर हल्ला केला होता. त्या हल्ल्याचे तुम्ही त्यांना बक्षिस दिले आहे का? कृषी मंत्र्यांना हाकलून द्या अशी आमची मागणी होती. कृषी खाते काढले म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचा संताप कमी होणार नाही", असे छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi

महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रमी खेळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खाते काढून घेण्यात आले आहे.