Mumbai Maharashtra Breaking News Highlights : गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश महाजन आणि संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असून दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या देखील चर्चा सुरु आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज अनेक नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता देखील महिलांना मिळण्यास सुरुवात झाली आहे.
तसेच राज्यात मॉन्सूनला सुरुवात झाली असून मुंबईतील अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आज अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे.
या निमित्ताने किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Breaking News Live Updates/ Shivrajyabhishek Din 2025 Live Updates : राजकीय इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
कल्याण रेल्वे स्थानक भागात पुण्याजवळील महिलेला लुटले
कोकण मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसच्या पावसाळ्यात फेऱ्या कमी करण्याचा निर्णय; कोकण विकास समितीची सहा दिवस गाडी चालविण्याची मागणी नाकारली
ठाकुर्लीत ९० फुटी रस्त्यावर मोटारीची काच फोडून नेल आर्टिस्टच्या पैशांची चोरी
खंडणी प्रकरणी आंदेकर टोळीतील गुंडां विरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात पोलीस कर्मचार्याने उकळली २८ हजारांची खंडणी; सेवेतून निलंबित
कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात शिवसेनचे घंटानाद आंदोलन; दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिंदे, ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक
उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरणी चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
निकालाआधीच पदव्युत्तरची प्रवेश प्रक्रिया
शेतकरी अनुदान अपहार प्रकरणी आंतरजिल्हा चौकशी पथके
काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सतेज पाटलांना धक्का
काही मंडळी वडिलांच्या नावावर फुशारक्या मारतात
गोव्यानंतर १ ऑगस्टपासून सोलापूर-मुंबईसाठीही विमानसेवेचे संकेत
नक्षलविरोधातील लढाई अंतिम टप्प्यात - फडणवीस
आणीबाणीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळणे गरजेचे, भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे मत
पावसामुळे पालेभाज्या कडाडल्या ; नुकसानीमुळे कमी शेतकऱ्यांना लाभ
सार्वजनिक कर्कशपणा
खळबळजनक…! एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार….
हृदयद्रावक ! मोठ्या भावासोबत आंघोळीसाठी कालव्यात उतरला आणि….. आठ वर्षीय बालकाचाही….
सीईटी सेलचा मोठा निर्णय; सलग दुसऱ्या वर्षी या अभ्यासक्रमाची दोनवेळा सीईटी
सरन्यायाधीश भूषण गवई यांचे परदेशात मोठे विधान, जगातील व्यावसायिक भांडणतंटे सोडविण्यासाठी भारत…
विनाकारण रेल्वेत साखळी ओढणाऱ्यांवर कारवाई ; ४५ हजार रुपयांचा दंड
मंत्री संजय शिरसाट यांचा पाय अधिक खोलात
महावितरण कंपनीत २५० जागा भरणार, पात्रता केवळ…
आमदार होणे सोपे नाही; लग्नात नाचण्याचेही सोंग करावे लागते, मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली
रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
ढोल ताश्याचा गजर, मंत्रोच्यार आणि शंखानाद, शिवरायांच्या गजरात किल्ले रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातील ८० हजारहून अधिक शिवभक्त गडावर दाखल झाले होते.
वाचा सविस्तर
Shivrajyabhishek Din 2025 : रायगडावर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
UPSC New Portal : पूजा खेडकर प्रकरणानंतर यूपीएससीचा मोठा निर्णय, फसवणूक टळणार अन् उमेदवारांनाही होणार फायदा
'युतीबाबत उद्धव ठाकरेंच्या मनात काय? हे जास्त महत्वाचं', संदीप देशपांडे यांचं विधान
"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात २०१७ साली देखील काहीतरी होतं. त्याआधी २०१४ साली देखील महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काहीतरी होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात काय आहे? हे जास्त महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं त्या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य नाही. आता ते काय बातमी देणार आहेत ते मला माहिती नाही. पण ते जर म्हणत असतील तर आपण सर्वजण बातमीची वाट पाहूयात", असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल", उद्धव ठाकरेंचं मनसेशी युतीबाबत मोठं विधान
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे; रिवा-पुणे एक्सप्रेस आता आठवड्यातून एक दिवस
शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त किल्ले रायगडावर शिवप्रेमींची गर्दी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)