‘कांतारा’चा दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टीने आपण कधीच रश्मिका मंदानावर टीका केली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या IFFI च्या पत्रकार परिषदेत त्याने सर्व अफवांना पूर्णविराम दिला. एक हिट चित्रपट दिल्यानंतर मला कन्नड फिल्म इंडस्ट्री सोडायची नव्हती, असं विधान आपण केलं होतं, ते कोणावरही टीका करण्यसाठी नव्हतं असं रिषभने म्हटलं आहे.

‘५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’मध्ये ‘कांतारा’साठी रिषभ शेट्टीला विशेष ज्यूरी पुरस्कार देण्यात आला. ‘इफ्फी’च्या पत्रकार परिषदेत बोलताना ऋषभ म्हणाला, “‘कांतारा’ला इतकं मोठं यश मिळवून देण्याचं श्रेय मला कन्नड प्रेक्षकांना द्यायचं आहे. त्यांच्यामुळेच या चित्रपटाबद्दल इतर लोकांना माहीत झालं. हा चित्रपट इतर राज्यांमध्ये पोहोचला. मी कन्नड प्रेक्षकांचा नेहमीच ऋणी आणि आभारी आहे. त्यामुळे मला फक्त एक हिट दिल्यानंतर इंडस्ट्री सोडणारी व्यक्ती बनायचे नाही.”

Gaurav Kumar dhoni fan
MS Dhoni: ‘त्याला हिरो बोलणं बंद करा’, १२०० किमी सायकलिंग करून आलेल्या चाहत्याकडं धोनीनं पाहिलंही नाही
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
censor board clear stand on emergency movie in bombay high court
इमर्जन्सी’तील काही दृश्यांना कात्री लावल्यास प्रदर्शनाला हिरवा कंदील; सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात भूमिका
Amit Shah Nagpur, BJP, Congress, Vidarbha,
महाशक्तीला विदर्भात काँग्रेसची भीती का वाटते ?
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
High Court asks Censor Board over the exhibition certificate of the film Emergency Mumbai print news
देशातील नागरिक मूर्ख वाटतात का ? ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शन प्रमाणपत्रावरून उच्च न्यायालयाची सेन्सॉर मंडळाला विचारणा
women killed by daughter in Khalapur raigad
रायगड: प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीनेच आईची केली हत्या
What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”

“पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”, नीना गुप्ता यांच्या ‘फालतू फेमिनिझम’ विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया

अशातच एका युजरने एक्सवर पोस्ट केली आणि लिहिलं की मी रिषभ शेट्टीची मनापासून माफी मागतो, त्याने हेच म्हटलं होतं. त्याचा अर्थ असा होता की त्याला एक हिट चित्रपट दिल्यानंतर कन्नड इंडस्ट्री सोडायची नाही. रिषभ शेट्टीने पोस्टला उत्तर दिलं आणि “काही हरकत नाही, शेवटी मला काय म्हणायचं आहे ते कोणाला तरी समजलं,” असं तो म्हणाला.

“मी नेहमी चुकीच्या लोकांना डेट केलंय”, नीना गुप्ता यांचं वक्तव्य; म्हणाल्या, “खूप फालतू अन् वाईट…”

दरम्यान, रश्मिकाने तिच्या करिअरची सुरुवात कन्नड चित्रपटाने केली होती आणि आता ती इतर भाषेतील चित्रपटांमध्ये अभिनय करत आहे. त्यामुळे काही काळापूर्वी जेव्हा आपल्याला इतरांप्रमाणे कन्नड इंडस्ट्री सोडायची नाही असं विधान रिषभने केलं होतं तेव्हा त्याने रश्मिका मंदानाला टोला लगावला होता, असं म्हटलं गेलं. पण अखेर त्याने त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.