मुंबई : वांद्रे-वरळी सागरीसेतूवरील भीषण अपघातानंतर अखेर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) जाग आली आहे. सागरीसेतूवरील सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन त्यात आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. शून्य अपघात हे आमचे उद्दिष्ट असल्याचा दावा करीत अपघातांना आळा घालण्यासाठी नव्या उपाययोजना करण्यात येतील असेही एमएसआरडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा… दिवाळीपूर्वी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन? लवकरच तारीख निश्चित होण्याची शक्यता

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
Cyber Criminal, Small Amount Fraud, target, Cyber Police, Maharashtra, Unwilling to Register, small fraud cases,
सायबर फसवणुकीच्या हजारो तक्रारींची नोंदच नाही; कोट्यवधी रुपये गुन्हेगारांच्या घशात

बुधवारी मध्यरात्री सागरीसेतूवर हा भीषण अपघात झाला. मध्यरात्री २.४० वाजण्याच्या सुमारास एका गाडीचा अपघात झाला. जखमींना आणण्यासाठी तिथे रुग्णवाहिका पोहोचली. पण २.५३ वाजता येथून जाणाऱ्या गाड्यांनी अपघातग्रस्त गाडीसह रुग्णवाहिकेला धडक दिली. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. या अपघातानंतर सागरीसेतूच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आता येथील सुरक्षेचा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच या अपघाताचीही स्वतंत्र चौकशी एमएसआरडीसीकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा… भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीची पोलिसांसह चार जणांना धडक

प्रथमदर्शनी यात वाहनचालकाची चूक असल्याचे आढळले आहे. पण नेमके काय घडले आणि यात कोणाची चूक आहे हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पहिला अपघात झाल्यानंतर सात मिनिटांत टोईंग वाहन आणि रुग्णवाहिका दुर्घटनास्थळी पोहचली. घटनास्थळी रस्ता रोधक उभे करण्यात आले. पण दुर्दैवाने दुसरा अपघात झाला. आता नेमके हे कसे घडले हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल. सागरीसेतू अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.