चंद्रपूर: आधीच प्रदूषित असलेल्या चंद्रपूरमध्ये हिवाळ्यात प्रदुषणात पुन्हा वाढ झाली आहे. ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये येथे प्रदुषणात वाढ झाल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून लक्षात येते. विशेष म्हणजे, सुक्ष्म धूलिकनाचे वाढलेले प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे.

नोव्हेंबरच्या एकूण ३० दिवसांपैकी ३० ही दिवस प्रदूषित होते. ०-५० चांगला आणि ५१-१०९ समाधानकारक, असा निर्देशांक असलेला एकही दिवस नव्हता. १००-२०० निर्देशांक असलेले १९ दिवस प्रदूषित होते. २०१-३०० अतिशय वाईट निर्देशांक असलेले ११ दिवस अतिशय जास्त प्रदूषण आढळले. समाधानाची बाब म्हणजे, विदर्भात अनेक ठिकाणी आढळलेले अतिशय धोकादायक प्रदूषण येथे आढळले नाही, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

Only 14 thousand 839 applications in 117 days for allotment of 2030 houses of Mumbai Mandal of MHADA Mumbai news
सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ ? म्हाडाकडे ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Grah Gochar September 2024 Chaturgraha yoga
आता पडणार पैशांचा पाऊस! सप्टेंबर महिन्यात निर्माण होणार चतुर्ग्रही योग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींची होणार चांदी
What Supriya Sule Said About Badlapur Crime
Badlapur Crime : “भर चौकात नराधमांना फाशी देत नाही तोपर्यंत..”, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
Mercury transit of Kanya rashi create Bhadra Rajyoga
भद्र राजयोग देणार भरपूर पैसा; बुध ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
Onion Mahabank is not viable even easier viable storage of onion is possible
कांदा महाबँक व्यवहार्य नाही, त्यापेक्षा ‘हे’ व्यवहार्य पर्याय स्वीकारावेत
mining construction work health risk
सिलिकोसिस म्हणजे काय? बांधकाम मजूर अन् खाणकामगारांमध्ये फुफ्फुसाच्या या जीवघेण्या आजाराचा धोका वाढण्याचे कारण काय?
in pune husband saved wife by donating his kidney to her successful kidney transplant Pune news
दुर्धर आजाराने ग्रस्त पत्नीला पतीमुळे जीवनदान! भिन्न रक्तगट असूनही मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वी

हेही वाचा… नितीन गडकरी म्हणतात, तृतीयपंथीयांनी…

प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्षसंख्येत वाढ करणे, शहरात सायकलचा उपयोग वाढविणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, औद्योगिक प्रदूषण रोखणे, नागरिकांनी प्रदूषण होऊ नये अशा उपाययोजना करणे आणि प्रशासनाकडून कठोर उपाययोजना राबवण्यात आल्या तरच प्रदुषणावर नियंत्रण येईल, असे पर्यावरण अभ्यासकांचे म्हणणे आहे.

कारणे काय?

वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघनारा धूर, धूळ, रस्त्यांवरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग, इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडे सर्वत्र प्रदुषणात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक शहरात अलीकडे विकासासाठी विविध बांधकामे, रस्ते बांधणी सुरू असते. त्यातच वाहनाच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातून मोठ्या प्रमाणावर धूळ आणि धूर बाहेर पडते. बहुतेक शहरातही अशाच समस्या निर्माण होत असल्याने प्रदुषणात वाढ होत आहे.

रोगराईत वाढ

हिवाळ्यात दरवर्षी प्रदूषण वाढते. थंडीमुळे आणि संथ वाऱ्यामुळे प्रदूषके वाहून न जाता एकाच ठिकाणी जमिनीवर स्थिर होतात. पूर्वी हिवाळा आरोग्यासाठी उत्तम मानला जात असे. परंतु अलीकडे प्रदुषणामुळे तो धोकादायक ठरत आहे. हे प्रदूषण आधीच श्वसनाचे आजार असणाऱ्यांना हानिकारक असते, तसेच नव्याने श्वसनाचे रोग वाढू शकतात. दमा, टीबी, हृदयरोग आणि मानसिक रोगही बळावतात.