अंबाझरी तलावालगतच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन पडणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती आंदोलन करीत आहे.एमटीडीसीने अंबाझरी उद्यान आणि स्मारकाच्या ४४ एकर जागा गरुडा कंपनीला ३० वर्षासाठी लिजवर दिली आहे. या कंपनीने कोणाचीही परवानगी न घेता येथील झाडे कापली आणि इमारत पडली. त्यामुळे आंदोलन चिघळले आहे.

हेही वाचा >>>वर्धा: मन मोहून टाकणारी खादीवरील नैसर्गिक रंगांची उधळण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे अतिरिक्त मुख्य आयुक्त यांनी नागपूर विभागीय आयुक्तांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.तर, विकासक गरुडा कंपनीच्या संचालकांनी आपण झाडे कापली नाहीत, डॉ आंबेडकर भवन पाडले नाही. भवन आणि ९० ते १०० झाडांची पडझड वादळाने झाल्याचा अजब दावा केला आहे. नागपुरात ८ जून २०२१ ला वादळ आले, त्यात १०० झाडे आणि इमारतीची पडझड झाली. असे १० जून २०२१ ला पत्राद्वारे कळवले. त्याची चौकशी विभागीय आयुक्त करीत आहे.