scorecardresearch

Premium

चित्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी आमची, पण… केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना नेमके म्हणायचे तरी काय?

मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन चित्त्यांचा आणि भारतात जन्मलेल्या तीन बछड्यांच्या मृत्यूची जबाबदारी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वीकारली.

Union Environment Minister Bhupendra Yadav
चित्त्यांच्या मृत्यूची जबाबदारी आमची, पण… केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांना नेमके म्हणायचे तरी काय? (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या तीन चित्त्यांचा आणि भारतात जन्मलेल्या तीन बछड्यांच्या मृत्यूची जबाबदारी अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी स्वीकारली. मात्र, त्याचवेळी भारतातील चित्ता स्थलांतरण प्रकल्पाला मोठे यश मिळेल, असा आशावाददेखील त्यांनी व्यक्त केला.

चित्त्यांच्या मृत्यूनंतर कुनोतील त्यांचा अधिवास, व्यवस्थापन, चित्त्यांसाठी अपुरी शिकार यावर तज्ज्ञांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. तर या प्रकल्पातील प्रमुख तज्ज्ञाने या धोक्यांचा आधीच इशारा दिल्यानंतरही त्यांना प्रकल्पातून बाजूला सारले गेले, यावरूनही बरीच टीका झाली. त्यावर आता केंद्र सरकारने सारवासारव सुरू केली आहे.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

हेही वाचा – नागपूर : हवामानाने बदलले रंग, मान्सूनपूर्व पावसाच्या सरी नाही, तर…..

हा आंतरराष्ट्रीय प्रकल्प असल्याने मृत्यूचा अंदाज होता. भारतात येण्यापूर्वीच एक मादी चित्ता आजारी होती. तर इतर दोघांच्या मृत्यूची कारणेही माहिती आहेत. चित्त्याच्या बछड्यांना मात्र येथील वाढत्या तापमानाचा फटका बसला. त्यामुळे जे काही घडले त्याची जबाबदारी आमची आहे. मात्र, हा प्रकल्प यशस्वी होईल आणि देशाला त्याचा अभिमान वाटेल, असेही भूपेंद्र यादव म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-06-2023 at 16:53 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×