शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने स्पष्ट केले. राज्यात शिक्षकांच्या ३० हजार रिक्त जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यासाठी राज्य परीक्षा परिषदेने आयबीपीएसच्या माध्यमातून २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली.

या परीक्षेसाठी राज्यभरातील २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निकालाच्या तारखेचा अंदाज उमेदवारांना येण्यासाठी संकेतस्थळावर स्पष्टीकरण दिले. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

challenge to the forest officials to find the tigress dropped radio collar
नागपूर : ‘रेडिओ कॉलर’ निघाली; ‘त्या’ वाघिणीचा शोध घेण्याचे वनाधिकाऱ्यांपुढे आव्हान
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
When will the delayed MPSC exams be held The commission told reason
‘एमपीएससी’च्या लांबलेल्या परीक्षा कधी होणार? आयोगाने सांगितले कारण…
Analysis on Environmental Component in Gazetted Civil Services Joint Pre Examination and State Services Pre Examination
Mpsc मंत्र: पर्यावरण घटक