पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत यावेळी त्यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांचे स्वागतच : सुप्रिया सुळे

बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला भागात वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची सभा होत आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वांच्या सभा सर्व ठिकाणी झाल्या पाहिजेत, ही चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये गैर काय आहे. आपल्या संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिला असून आम्ही काही दडपशाहीवाले नाहीत. कोणी कुठेही जायचे, धमक्या द्यायचे ही आमची परिस्थिती नाही. सर्वांनी सर्वांच्या मतदारसंघात जावे, देशाच्या सेवेसाठी लढावे. मी त्यांचे स्वागतच करते, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली.

ganesh naik, sanjeev naik, thane, lok sabha election 2024, shiv sena, shinde group, sanjeev naik
ठाण्यासाठी नाईक नकोतच, शिवसेना नेत्यांचे मुख्यमंत्र्यांना गाऱ्हाणे
supriya sule ajit pawar
“साहेबांना आणि मुलीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या”, अजित पवारांच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाल्या…
Yavatmal Shivsena Thackeray
यवतमाळ : शिवसेना ठाकरे गटात निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बदल; अनुभवी व जुन्या शिवसैनिकांना दूर सारत नवीन कार्यकर्त्यांना संधी
ahmednagar marathi news, aam aadmi party bjp marathi news, aap bjp workers dispute marathi news
भाजप व आपचे कार्यकर्ते नगरमध्ये परस्परांना भिडले; घोषणायुद्ध

हेही वाचा – पुणे: येरवड्यात कोयता गॅंगची दहशत, तरुणावर वार; चार अल्पवयीन मुले ताब्यात

त्यांना ‘सौ’ खून माफ असतात : सुप्रिया सुळे

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या इच्छुक उमेदवाराकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यावर मला काहीही आश्चर्य वाटत नाही. नियमावर केंद्र आणि राज्य सरकार चालतच नाही. विरोधकांसाठी नियम आणि कायदे आहेत. त्यामुळे त्यांना ‘सौ खून माफ’ असतात, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हेही वाचा – पुणे : चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळेंचे मौन

केंद्र सरकारला 2024 च्या निवडणुकीअगोदर शेवटची संधी : सुप्रिया सुळे

केंद्राचे बजेट सादर केल जाणार आहे. त्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजे. या सरकारचे हे शेवटचे मोठ बजेट आहे. केंद्र सरकारला 2024 च्या निवडणुकीअगोदर शेवटची संधी आहे, अशा शब्दांत केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे यांनी टीका केली.