राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॅा. जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळेच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना अशा लोकांची तोंड बंदच करायला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं म्हणून कोणाच्या व्यंगावर किंवा आजारावर बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही, असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आम्ही निर्णय घेतला तर अशांची तोंडं बंद करायला वेळ लागत नाही. तुम्हाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. मात्र, कोणाच्या व्यंगावर, आजारावर बोलण्याचं तुम्हाला स्वातंत्र्य नाही. कायद्याने त्याला बंदी आहे. तुम्ही कायद्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिव्या घालू शकत नाही.”

eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Ramdas Athawale, raj thackeray
“महायुतीला राज ठाकरेंच्या पाठिंब्याची गरज नव्हती, मात्र…”, रामदास आठवले यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर

“नवबौद्ध फुकट येण्यासाठी जयंती साजरी करण्यासाठी येतात असं तुम्ही म्हणू शकत नाही. हे म्हणण्याचे धारिष्ट्य दाखवणे म्हणजे भारतीय संविधानाला आव्हान देणं आहे. मला वाटतं अशी थोबाडं गप्पच केली पाहिजे,” असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं.

एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी एमआयएमच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरही मत व्यक्त केलं. एकीकडे एमआयएमच्या सभेला भरगच्च उपस्थिती लाभत आपली तरी मुंब्र्यात मात्र वेगळेच चित्र दिसत आहेत. मुंब्र्यातील शेकडो एमआयएम कार्यकर्ते एक वेगळेच नगरसेवक निवडणूकीत उभे असलेले इक्बाल भाई मुलानी यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

हेही वाचा : “हे सर्व आमचं सरकार गांभीर्याने घेत नाही, नाहीतर…”; केतकी चितळेने केलेल्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “कुठलाही पक्ष जेव्हा काम करतो तेव्हा गरीबांना त्याच्याविषयी आस्था, आपुलकी वाटू लागते. जो पक्ष सर्वसामान्यांच्या मदतीला आपणहून धावतो तेव्हा लोक स्वतःहून या पक्षात जायला पाहिजे असा विचार करतात. तसंच ठाणे, मुंब्रा, कळवा या भागात घडतं.”