ठाणे : भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मुंबई आणि मुंबईकर आहेत. असे असूनही दररोज लोकल अपघातात मुंबईकर आपल्या रेल्वे प्रवासी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडतात. मुंबईतील भगिनींचे कुंकु ‘सिंदूर’ नाही का? असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेने विचारला आहे. मुंबई रेल प्रवासी संघटनेने प्रस्तृत केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई रेल्वे प्रवाशांच्या मरणयातना कधी संपणार? मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मुंबई आणि मुंबईकर आहेत. गेल्या दहा वर्षात भारतीय रेल्वेने प्रगतीची भरारी घेतली परंतु मुंबईतील रेल्वे अपघात कमी होत नाही. आजच्या घटनेची पुर्व सुचना आम्ही रेल्वेला दिली होती, दिवा ते कळवा गर्दी होत आहे तसेच या गर्दीमुळे वळणावर ट्रेन झुकते आहे या बद्दलची माहिती सुद्धा दिली गेली होती. मग डीआरएम यांनी यावर काय कारवाई केली? जर कारवाई नसेल केली तर त्यांच्यावर कारवाई कारवाई करण्यात यावी.

महाराष्ट्र राज्य आणि केंद्र सरकार एकत्र येऊन पीपीपी तत्त्वावर एमआरव्हीसी स्थापना झाली. याचे मुळ उद्देश एमयुटीपी अंतर्गत प्रकल्प मार्गी लावणे, प्रकल्पासाठी निधी व्यवस्था करणे, जागेची उल्पब्धता करणे, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करणे असे आहे. तरी सुद्धा कळवा ऐरोली लिंक, कुर्ला पुढील ५ ते ६ मार्गिका असे महत्वाचे प्रकल्प रखडलेले आहेत. तसेच अतिरिक्त येणाऱ्या लोकल सुद्धा अजूनही आलेल्या नाहीत. हे प्रकल्प पुर्ण करण्यासाठी लागणारी जागा राज्य सरकारने हस्तक्षेप करून त्वरित रेल्वेच्या ताब्यात द्यावी. रेल्वेने कोणतेही करणे न देता हे प्रकल्प पुर्ण करावेत असेही त्यांनी म्हटले आहे.

कुर्ला ते कल्याण सहा रेल्वे रुळ उपलब्ध आहेत. त्यामध्ये चार रेल्वे रुळ लोकलसाठी आरक्षित असतानाही रेल्वे तर्फे मेल गाड्या सोडल्या जातात. दिवा नवीन ट्रॅक झाल्यावर वास्तविक ठाण्या पर्यंत लोकल वाढविल्या पाहिजे होत्या. पण नवीन ट्रॅकवर सुद्धा मेल एक्सप्रेस चालवण्यात येत आहेत. तसेच मेल एक्सप्रेस उशिराने मुंबईत पोचतात. त्यांना प्राधान्य देऊन मुंबई लोकल थांबवण्यात येतात. त्यामुळे अतिगर्दी होऊन प्रवासी रेल्वे मधुन पडत आहेत. खरे म्हणजे सर्वच मेल एक्सप्रेस सीएसएमटी पर्यंत आणण्याची आवश्यकता नाही. त्या कल्याण , वाशी, बोरिवली, दिवा, पनवेल येथूनच परत सोडल्या पाहिजेत त्यामुळे मुंबईतील रेल्वे वरील ताण कमी होईल अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई लोकलचे सध्याचे दरवाजे हे लोखंडी आहेत. त्यामुळे ते अतिवजनाचे आहेत, त्या ऐवजी अल्युमिनियम किंवा इतर हलक्या प्रकारे ते तयार केल्यास त्याच लोकलला ते बसवता येतील. परंतु गर्दीच्या वेळेत ते बंद होणारच नाहीत. त्यामुळे वेगळी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण होईल. ती टाळण्यासाठी मेट्रो प्रमाणे रेल्वे स्थानकात स्वयंचलित तिकीट दाखवून प्रवेश देणारे दरवाजे असावेत. विनातिकीट प्रवासी, गर्दुल्ले यावर नियंत्रण ठेवता येईल तसेच प्रत्येक तासाला प्रवासी क्षमते पेक्षा कित्येक पटीने जास्त फलाटावर येणाऱ्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवता येईल. सध्या असे कोणतेच नियंत्रण नसल्याने जरी रेल्वे सेवा बंद पडली किंवा विलंबाने झाली तरी प्रचंड प्रमाणात गर्दी प्लॅटफॉर्मवर येते आणि अपघाताची शक्यता निर्माण होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे मुंबईची मग निर्णय घेणारे अधिकारी दिल्लीत का? मुंबई लोकल रेल्वे मेल एक्सप्रेस सेवे पासून वेगळी करून मुंबई मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर सेवा यासाठी वेगळे प्राधिकरण करण्यात यावेत आणि लोकल संदर्भातील निर्णय राज्य पातळीवर घेण्यात यावेत असेही त्यांनी स्पष्ट केले.