भाईंदर :- भाईंदर रेल्वे स्थानकावरून सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी सुटणारी वातानुकुलीत लोकल कायम सुरू ठेवणार असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे. ही लोकल एसी ऐवजी सर्वधारण करावी यासाठी रेल्वे प्रवाशांनी आंदोलन केले होते. मात्र प्रवाशांना दिलासा देण्यासाठी भाईंदर स्थाकातून सकाळी ८ वाजता सुटणारी सर्वसाधारण लोकल ट्रेन १२ ऐवजी १५ डब्यांची केली जाणार आहे. 

भाईंदर रेल्वे स्थानकातून दररोज सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी चर्चगेटला जाणारी लोकल ट्रेन सुटत होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात ही लोकल ट्रेन वातानुकूलीत (एसी) करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांनी जोरदार विरोध केला होता. ही लोकल पुन्हा सुरू करावी यासाठी सह्यांची मोहीम घेण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी यासाठी आंदोलने देखील केली होती. आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रवाशांच्या मागणी लक्षात घेऊन रेल्वेला पत्रव्यवहार करून ८.२४ ची लोकल पुन्हा सर्वसाधारण करण्याची मागणी केली होती. मात्र एसी लोकल रद्द करता येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले.

Mumbai Kavach four point zero system will reduce distance between two locales from 180 to 150 seconds
मध्य, पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त ३०० लोकल फेऱ्या, दोन लोकलमधील वेळ कमी होणार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karjat CSMT local services delayed morning Kalyan, Dombivli central railway local train services passengers
सकाळच्या कर्जत-सीएसएमटी लोकल न आल्याने कल्याण, डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये गोंधळ
Metro service for cricket fans in Nagpur till 11.30 pm on 6th february
नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री ११.३० पर्यंत
Mumbai local-train
Mumbai Local : ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल सेवा विस्कळीत; एकापाठोपाठ लोकलच्या रांगा!
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…

हेही वाचा >>>वसईत आरटीई  प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

म्हणून वातानुकूलीत लोकल सुरू केली..

याबाबत रेल्वने लेखी स्पष्टीकरण दिले आहे. दररोज सकाळी  ७.५९ वाजता विरार वरून चर्चगेटला जाण्यासाठी एसी लोकल सुटते. मात्र त्यात गर्दी होत असल्याने भाईंदर, मिरा रोड, दहिसर स्थानकातील   प्रवाशांना त्यात चढणे अवघड होत होते. त्यामुळे भाईंदर वरून एसी लोकलची आवश्यकता होती. भाईंदर स्थानकातून सकाळी ८ ते ८. ३० दरम्यान चर्चेगेटच्या दिशेने जाण्यासाठी साधारण ९ गाड्या आहेत. त्यामुळे फक्त  ८. २४ ची एक सर्वसाधारण लोकल वातानुकुलित करण्यात आली आहे. तरी देखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ८ वाजता सुटणार्‍या भाईंदर- चर्चगेट लोकलमध्ये ३ डबे वाढवून १२ ऐवजी १५ डब्यांची करण्यात आली आहे, असे पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापक प्रकाश बुटणी यांनी सांगितले.

Story img Loader