बिहामध्ये दिवाळीच्या एक दिवाळीच्या एक दिवस अगोदरपासून एक पाठोपाठ एक विषारी दारूच्या घटना आणि ४० पेक्षा अधिक जणांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कडक पावलं उचलण्यास सुरूवात केल्याचं दिसत आहे. तीन दिवस अगोदरच त्यांनी राज्यात दारूबंदीला आणखी प्रभावीपणे लागू करण्यासाठी मोठं अभियान चालवण्याचे विधान केलं होतं. आता त्यांनी १६ नोव्हेंब रोजी या संबंधी चर्चेसाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. असं मानलं जात आहे की बैठकीत मुख्यमंत्री दारू माफियांविरोधात मोठी कारवाईची घोषणा करू शकतात.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोमवारी सांगितलं की, विषारी दारूच्या घटनांमधील दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी म्हटलं की दारूबंदीतून बऱ्याच प्रमाणात या समस्येवर अंकुश लावला जाऊ शकतो. काही जणच यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना जागृत देखील केलं जाईल. विषारी दारू प्रकरणात जबाबदार आढळलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. तसेच, त्यांनी अधिकाऱ्यांना हे देखील विचारलं की जिल्हा ओलांडून तस्कर कसे काय येतात? आणि दारूवर कडक बंदीचे आदेश दिले.

cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Case of denial of soldiers allowance to family members No decision on martyrs wifes demand due to Lok Sabha elections
कुटुंबीयांना सैनिक भत्ता नाकारण्याचे प्रकरण : लोकसभा निवडणुकांमुळे शहीद पत्नीच्या मागणीवर निर्णय नाही

“मी वारंवार सांगितलंय तुम्ही चुकीची गोष्ट प्यायल्यानंतर…”, बिहारमध्ये २४ जणांच्या मृत्यनंतर नितीश कुमार यांची प्रतिक्रिया

याच दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दारू व्यवसाय करणाऱ्यांविरोधात पोलिसांचा कठोर पवित्रा दिसत आहे. अनेक जिल्ह्यात अभियान चालवून पोलीस सातत्याने दारू भट्ट्या उध्वस्त करत आहेत.