Ravi Shastri Had Fired Up Mohammed Shami By Taunting: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यासह तो खवय्या देखील आहे. त्याचं बिर्याणीवर असलेलं प्रेम जगजाहीर आहे. दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण यांनी मोहम्मद शमीचा एक रोमांचक किस्सा सांगितला आहे.

रवी शास्त्री यांनी सांगितलेला किस्सा हा २०१८ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना जोहान्सबर्गमध्ये सुरू होता. या सामन्यातील चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २२३ धावा करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेचे केवळ २ विकेट्स गमावल्या होत्या.

हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेकडे ही मालिका ३-० ने आपल्या नावावर करण्याची संधी होती. लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने १७१ धावांपर्यंत मजल मारली होती. अजूनही ७ फलंदाज शिल्लक होते. लंच ब्रेकमध्ये मोहम्मद शमी प्लेटभरून बिर्याणी खात होता, हे रवी शास्त्रींनी पाहिलं.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, रवी शास्त्री म्हणाले, “लंच ब्रेकच्या वेळी मी शमीच्या प्लेटमध्ये भरपूर बिर्याणी पाहिली. त्यावेळी मी त्याला विचारलं, “तुझी भूक इथे संपली का?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी शास्त्री जे काही म्हणाले, त्याचा मोहम्मद शमीला प्रचंड राग आला. त्याने रागात बिर्याणीची प्लेट फेकून दिली आणि म्हणाला, घ्या तुमची बिर्याणी,नकोय मला आणि मैदानात निघून गेला. त्याला जो राग आला होता, तो त्याने मैदानावर काढला. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ५ गडी बाद केले आणि भारतीय संघाला दमदार विजय मिळवून दिला. त्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना अवघ्या २८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव अवघ्या १७७ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ६३ धावांनी आपल्या नावावर केला. ज्यावेळी तो मैदानात परतला, त्यावेळी भरत अरूण त्याच्याकडे बिर्याणी घेऊन गेले आणि त्याला म्हणाले, “घे, आता वाटेल तितकी बिर्याणी खा.” त्यावेळी शमी त्यांना म्हणाला की, “आम्हाला नेहमी राग देत जा, मग सर्वकाही ठिक होतं.” शमीने सर्व राग मैदानावर काढला आणि भारतीय संघाला विजय मिळवून दिला.