Maharashtra Political Crisis Updates: राज्यात सत्तांतर झाल्यानंतरच्या पहिल्याच पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांना जशास तसं उत्तर देण्याचे आदेश दिल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय मंडळ आणि निवडणूक समितीतून वगळलं असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याउलट निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीसांना स्थान देत पक्षाने त्यांना महत्त्व दिल्याचं बोललं जात आहे. तसंच मोहित कंबोज यांनी सिंचना घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा नेता जेलमध्ये जाणार असल्याचा दावा केल्यामुळेही राजकारण तापलं आहे.