पुण्यातील कल्याणीनगर परिसरात १९ मे रोजी एका भीषण अपघतात दोन तरुणांचा जीव गेला. या अपघाताला कारणीभूत असलेल्या अल्पवयीन मुलाला तत्काळ जामीनही मिळाला होता. यावरून पुणेकरांनी संताप व्यक्त केला. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे राजकीय नेत्यांनीही यात आता हस्तक्षेप केला आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे. दरम्यान, दुसरीकडे राज्यातील मतदानाचे टप्पे पार पडले असले तरीही आता सर्वांची नजर ४ जूनकडे आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी वाचा.