Kajol Talks About Ajay Devgn : लोकप्रिय अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘माँ’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री व्यग्र आहे. यानिमित्त तिने अनेक मुलाखती दिल्या. यातील एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिच्या ‘इश्क’ या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे. या चित्रपटात अभिनेता आमिर खान, जुही चावला, अजय देवगण आणि काजोल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. काजोलने या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा तिचा अनुभव सांगितला आहे.

१९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्क’ या चित्रपटाचं दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं होतं. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काजोल या चित्रपटाबद्दल म्हणाली, “आमिर खानची चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर खूप चांगली मैत्री झाली होती आणि आमिर व जुही यांची मैत्रीसुद्धा खूप घट्ट होती, त्यामुळे बऱ्याचदा हे तिघे एकत्र गप्पा मारत असायचे. कधी कधी जुही व आमिर एकत्र असायचे आणि मी व अजय एकटे असायचो. पण, अजयच्या तुलनेत मी जास्तच एकटी असायचे. मला खूप एकटं असल्याची जाणीव व्हायची. तेव्हाच अजय आणि मी एकमेकांशी बोलायला लागलो आणि आमच्यामध्ये संवाद वाढले.”

काजोल पुढे म्हणाली, “आम्ही ३०० दिवस या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. चित्रपटाला बनायला ३०० दिवस लागले. आम्हाला काहीच कल्पना नाहीये की या चित्रपटासाठी एवढे दिवस का लागले. आम्ही दररोज ८-१० तास सेटवर असायचो त्यामुळे मी दिवसभर तर सगळ्यांशी बोलत बसू शकत नाही. जरी मला बोलण्याची खूप आवड असली तरी मला पण कधी कधी ब्रेकची गरज भासते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘इश्क’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २६ वर्षे झाली त्यावर्षी काजोल व अजय देवगणने एक खास आठवण शेअर केली होती. परंतु, अजय देवगणच्या कमेंटने त्यावेळी लक्ष वेधलं होतं. त्याने गमतीत याच चित्रपटाच्या सेटवर काजलोच्या हातातील अंगठी घेऊन तिला तीच अंगठी देत प्रपोज केल्याचं सांगितलं होतं. कालोज व अजय यांची प्रेमकहाणी ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. परंतु, ‘इश्क’ या चित्रपटाच्या सेटवर या दोघांमधील संवाद वाढले आणि तेव्हापासून ते एकमेकांना ओळखू लागले.